आटपाडी जिल्ह्याचे केंद्र बनवण्याच्या दृष्टीने व्यापक आराखड्याची रचना बनवली आहे,,,,,,, जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील. सांगली जिल्ह्यात सांगली नंतर सर्वाधिक क्षेत्रफळ आटपाडी नगरपंचायतीचे आहे. आटपाडी मापटेमळ आणि भिंगेवाडी एवढा मोठा पसारा कोणत्याही नगरपालिका, नगरपरिषदेला नाही. भविष्यात आटपाडी जिल्ह्याचे केंद्र करण्याच्या दृष्टीने जिल्हा उपरुग्णालय, नाट्यगृह, पाणी योजना यासारखी कामे उभारली आहेत. शहराला जोडणारे चारही बाजूचे प्रशस्त रस्ते बनवलेत. येलो झोन ग्रीन झोन बनवले आहे. माझ्या स्वतःच्या मालमत्तेवर सात ठिकाणी आरक्षण पडले आहे. आरक्षण थोड्या जागेवर पडेल मात्र त्यातून होणाऱ्या विकास कामामुळे राहिलेल्या जागेचे पाच ते दहा पट मूल्य वाढते. मला आटपाडी नगरपंचायत राज्यात पहिल्या दहा मध्ये बनवायची आहे.-- तानाजीराव पाटील.