स्वातंत्र्य लढ्यातील धगधगता निखारा -क्रांतीसिंह नाना पाटील;म्हणजेच स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील धगधगता अंगार. जुलमी ब्रिटिश राजवटीला अहवान देणारे नाव म्हणजेच क्रांतिसिंह नाना पाटील. त्यांच्या लढ्याची आजच्या तरुण पिढीला माहिती व्हावी आणि त्यातून प्रेरणा मिळाली यासाठीच हा लेखन प्रपंच मांडला आहे. ब्रिटीशांना सळो की पळो करून नीरा काठ पासून ते कृष्णा, वारणा नद्यांचा खोऱ्यात प्रतिसरकार अर्थात पत्री सरकार स्थापन केले. प्रतिसरकार अर्थात पत्री सरकार म्हणजे ब्रिटिशांचे सरकार मान्य नसून इथल्या लोकांच्यासाठी ब्रिटिशांच्या विरोधात उभारलेले प्रति सरकार होते.गोऱ्यांच्या गुलमी आणि अत्याचारी कारभारा विरोधात देशात वणवा पेटला होता. त्यावेळी यात क्रांतिसिंह नाना पाटील आघाडीवर होते. ब्रिटिशच्या विरोधात 9 ऑगस्ट 1942 रोजी क्रांतीसिंह नाना पाटील यांनी आपल्या सवंगड्यांना आणि देशभक्तांना सोबत घेऊन प्रति सरकारची स्थापना केली. ज्याला आपण "पत्री सरकार" म्हणूनही ओळखतो. भूमीगत चळवळीच्या माध्यमातून ब्रिटिशांना त्यांनी आव्हान दिले होते. ब्रिटिशांनी उभारलेली संदेशाच्या देवाणघेवाणीची यंत्रणा उ...
गर्जा जय जय महाराष्ट्र माझा.