मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्री. संत बाळूमामा देवस्थान समितीच्या बरखास्तीची आमदार गोपीचंद पडळकराची मागणी

आटपाडी ता.३०- आदमापूर ( जि. कोल्हापूर) येथील महाराष्टाचे जागृत देवस्थान संत बाळूमामांच्या लौकीकाला व्यवस्थापन समितीच भ्रष्ट आचरणातून धक्का लावण्याचं काम करत आहे. भ्रष्टाचारात बरबटलेली ही समिती विसर्जीत करून शासनानेच धर्मादाय कायदा आणून धनगर समाजाचे प्रतिनिधित्व असलेली नविन समिती निर्माण करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे केली असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.                                                                 आदमापुर जिल्हा्ह्हा््हा्ह्हा्हा्ह्््ह्हा््हा्ह्हा््हा्ह्हा् कोल्हापूर येथील श्री संत बाळूमामा हे महाराष्ट्रात जागृत देवस्थान म्हणून श्रद्धास्थान म्हणून मानले जाते. त्याच्या दर्शनासाठी राज्य देश आणि परदेशातून कोट्यावधी भाविक दरवर्षी येतात तेथे मोठे धार्मिक सोहळे पार पडतात. तेथील व्यवस्थापन समितीच्या भ्रष्ट कारभाराची तक्रार आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा लौकिक जगात पोहोचवला- आमदार गोपीचंद पडळकर

  आटपाडी ता.३०- केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नेतृत्वाखाली भाजप सरकारने नऊ वर्षात सर्व सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून शेतकरी सन्मान या महत्वकांक्षी योजनेपासून जागतिक स्तरावर देशाची मान उंचावेल अशा अनेक योजना राबविल्या असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.                                पंतप्रधान नरेंद्र मोदी @ 9  अभियानांतर्गत येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी आमदार पडळकर यांनी नऊ वर्षात केंद्र सरकारने राबवलेल्या योजनेवर प्रकाश टाकला. तसेच विरोधकांचाही खरपूस समाचार घेतला. यावेळी भाजपच्या ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष विलास काळेबाग, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, अनिल पाटील, जयवंत सरकार, आणि भाजपचे तालुकाध्यक्ष  उमाजी सरगर प्रमुख उपस्थित होते. ते म्हणाले,"सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना सन्माननिधी देऊन खऱ्या अर्थाने देश स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदाच शेतकऱ्यांचा सन्मान करून दाखव...

'मटण खाऊन केसीआर पंढरपूरात', आ.आमोल मेटकरीची सडकून टीका

      मुंबई-तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव महाराष्ट्रात येऊन शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते त्यांच्या बीआरएस पक्षाचं महाराष्ट्रात विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत. याचअनुशंगाने त्याचा सोलापूर दौरा होत आहे. यासाठी ते हैद्राबादवरून निघाले असून त्यांच्याबरोबर 400 ते 600 वाहणांचा ताफा आहे. तर यावेळी त्यांचे अख्खे मंत्रीमंडळच सोबत आहे. ते पंढरपूर येथे जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत. यावरून सध्या चर्चा होताना दिसत आहे. तर टीका ही. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी केसीआर यांच्या मेजवाणीचा फोटो ट्विट करत टीका केली आहे. त्यांनी मटनाचा शाही बेत! पंढरी वारिवर असताना मुख्यमंत्री केसीआर हा प्रकार शोभतो का? वारकऱ्यांच्या भावनाशी खेळू नका? पंढरपूर येताना 10 हजार वेळा विचार करा असा सल्ला दिला आहे. तर पंढरीची वारी पवित्र आहे आपल्या अश्या वागण्याने अपवित्र करू नका असं म्हटलं आहे. त्याचबोरबर महाराष्ट्रात तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे आगमन होण्यापुर्वी पैशाच्या जोरावर ठिकठिकाणी मटणाचे बेत आखले जात आहेत. बॅनरवर पांडुरंगाचे फोटो तर ...

माजी मुख्यमंत्र्याच्या मुलीने घेतला लिंग बदलण्याचा निर्णय

दिल्ली : अमेरिका आणि युरोप सारख्या देशात लिंग बदलने अगदी सामान्य झालं आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्वच क्षेत्रात प्रगती झाली आहे. IVF ने अनेक बदल घडवून आणले आहेत. भारतातही आता लिंग बदलून घेण्याचं प्रमाण वाढलं आहे. अशातच पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांची मुलगी सुचेतना भट्टाचार्य यांनी आपले लिंग बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सुचेतनाला ऑपरेशनद्वारे लिंग बदलून ‘सुचेतन’ बनायचे आहे. यासाठी त्यांनी कायदेशीर सल्लाही घेतला आहे. सुचेतना भट्टाचार्य यांनी काही दिवसांआधी LGBTQ वर्कशॉप मध्ये भाग घेतला होता. LGBTQ च्या हक्कांसाठी लिंग बदलण्याचे त्यांनी सांगितलं आहे. समाजातील ट्रांज जेंडर असणाऱ्या व्यक्तींच्या होणाऱ्या छळाला त्यांना थांबवायचं आहे म्हणूनत त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सुचेतनाला विश्वास आहे, तिच्या या निर्णयात तिचे घरचे साथ देतील, कारण सुचेतनाच्या वडिलांना, बुद्धदेव भट्टाचार्य यांना याबद्दल लहानपणापासूनच माहित आहे. लोक लिंग का बदलतात? जर एखाद्या पुरूषाचं शरीर हे पुरुषाचं असेल आणि मन स्त्रिच असेल याच्याच उलट एखादी स्त्री शरीराने स्त्री असते मात्र तिचं मन मात्र ...

*राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळाचे स्मारक करणे हा राज्य सरकारचा संकल्प - चंद्रकांत पाटील*

कोल्हापूर : आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती‌ निमित्त राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळी जाऊन महाराजांना अभिवादन केले. त्यानंतर कोल्हापुरातील नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्मारक सुशोभिकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांचे भूमिपूजन कार्यक्रमास त्यांनी उपस्थिती लावली.  यावेळी राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळाचे स्मारक करणे हा राज्य सरकारचा संकल्प असल्याचे सांगितले. तब्बल  ९ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे नुतनीकरण, तसेच राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनावरील कलादालन, परिसरातील लॅंडस्केपिंग, संरक्षक भिंत, पादचारी मार्ग, वाहनतळ, समाधीवास्तूंची दुरूस्ती, विद्युतीकरण आदी कामे केली जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.  यावेळी या वेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खा. धनंजय महाडिक, आ. प्रकाश आवाडे, आ. सतेज पाटील, आ. ऋतुराज पाटील, आ. जयश्री जाधव, आम. जयंत आसगावकर, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, भाजप जिल्हाध्यक्ष राहुल ...

साहित्य अकादमीतर्फे समर्थ रामदासांचे चरित्र २० भाषांत प्रकाशित होणार

पुणे :संत वाङ्मय आणि बहुभाषा अभ्यासक मनीषा बाठे लिखित समर्थ रामदासांवरील मोनोग्राफ (लघुप्रबंध/तात्त्विक चरित्र) साहित्य अकादमीकडून पुस्तक रूपात प्रकाशित करण्यात आला आहे. हे पुस्तक साहित्य अकादमीच्या 'भारतीय साहित्याचे निर्माते' या लोकप्रिय मालिकेत समाविष्ट झाले आहे. अशी पुस्तक-मालिका ही अकादमीतर्फे मूळ लेखन भाषेशिवाय एकूण २० भाषांमध्ये केली जाते. त्यामुळे हे पुस्तकही २० भाषेत जाणार आहे ! पुस्तकाच्या लेखिका मनीषा बाठे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. समर्थ रामदासांचे विचार, जीवनकार्य, संप्रदाय,भारत-भ्रमण, दासबोध आदी ग्रंथनिर्मिती यांचा मागोवा या पुस्तकात घेण्यात आल्याने ते महत्त्वाचा दस्तावेज ठरले आहे.  साहित्य अकादमीने २०२० मध्ये या विषयाच्या लेखनासाठी मनीषा बाठे यांची निवड केली होती, सदर सैद्धांतिक प्रबंध समीक्षणादी प्रक्रियेनंतर ३ वर्षांनी प्रकाशात येत आहे. याआधी साहित्य अकादमीच्या 'भारतीय साहित्याचे निर्माते' या लोकप्रिय मालिकेत मराठीतील ज्ञानदेव, नामदेव, केशवसुत व दत्तकवी आदींबाबत मोनोग्राफ पूर्वप्रसिद्ध आहेत. आता याच मालिकेत सम...

स्वातंत्र्यपूर्व वसाहतीमधील कैद्यांचे खुले कारागृह पाहून 'ते'' भारावले

                                                                  आटपाडी -येथील स्वातंत्र्यपुर वसाहतीमधील कैद्यांच्या खुल्या कारागृहाला मध्यप्रदेशचे शिक्षण मंत्री जयभान सिंक पवैयया यांनी भेट दिली. कैद्यासाठी असलेल्या या खुले कारागृह पाहून ते भारावले. गेल्या नऊ वर्षात मोदी सरकारने विविध नऊ कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे जीवनमान उंचावण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन मध्य प्रदेशचे शिक्षण मंत्री जयभान सिंग पवैयया यांनी केले. त्यांनी आटपाडीतील स्वातंत्र्यपूर्व साती मधील कायद्यांच्या खुल्या कारागृहाला भेट दिली. त्यानंतर पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते.                                                          केंद्रातील भाजप सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्या नि...

सांगलीत संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबीराला मोठा प्रतिसाद

                                                                    सांगली --संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फौडेंशनच्या वतीने बचत भवन जत येथे आयोजित रक्तदान शिबिरात 126 भक्तांनी उत्फुर्त सहभाग घेतला.     कार्यक्रमाचे उद्घाटन जतचे पोलीस उपविभाग अधिकारी सुनील साळुंखे साहेब यांचे हस्ते दिप प्रज्वलित करून झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले," देशाला शांती देण्याचे महान कार्य निरंकारी मंडळ करित आहे.आपण आज पाहतो आहे जगामध्ये हिंसाचारापोटी अनेकांचे रक्त नाल्यामध्ये फुकटचे व्यर्थ जात आहे.निरंकारी मंडळाचा उद्देश चांगला आहे. रक्त नाल्यामध्ये न वाहता मानवांच्या नसामध्ये वाहिले पाहिजे .आजच्या काळात मंडळाच्या विचारधारेची गरज आहे. त्यांनी मिशनच्या मानवतावादी कार्यास शुभेच्छा दिल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज रक्तपेढी मार्फत रक्त संकलन करण्यात आले. रक्तपेढीचे डॉ जगदीश कुमार रक्तदानाचे म...

शेटफळेत बहुजन विचार मंचाने साजरी केली छत्रपती शाहू महाराजांची जयंती

                                                                       आटपाडी ता. 26- शेटफळे (ता. आटपाडी) येथे बहुजन विकास विचार मंचाने छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केली.                          शेटफळे ता. आटपाडी येथे बहुजन विचार मंचाने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन केले होते. ग दि माडगूळकर स्मारकामध्ये हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतंगराव गायकवाड होते. स्वागत आणि प्रास्ताविक प्रा. सी. पी. गायकवाड यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी सामाजिक कार्याबद्दल गावचे सुपुत्र पतंगराव गायकवाड सेवानिवृत्ती बद्दल प्रा. डॉ. सयाजीराजे मोकाशी, एम.आर. गायकवाड आणि माणगंगा साखर कारखान्याच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल किसनराव गायकवाड...

सेतूचे सर्व्हर डाऊन, कधी पासून मिळणारं दाखले वाचा,,

  सांगली ता.२५ : सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यातील उपविभागीय, तहसिल कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर जातीचे व अन्य दाखले मागणीसाठी अर्ज प्राप्त होत आहेत. दाखले ऑनलाईन पद्धतीने तयार करून वितरीत करण्याची प्रणाली कार्यरत आहे. काही उपविभागीय, तहसिल कार्यालयाच्या ठिकाणी ऑनलाईन कामकाजामध्ये सर्व्हरची गती अतिशय कमी असल्याने दाखले तपासणे व ते मंजूर करून वितरीत करण्यास विलंब होत आहे. सर्व्हरच्या त्रुटीबाबत शासन स्तरावर अवगत करण्यात आले असून त्याअनुषंगाने शासन स्तरावर तक्रारीची नोंद घेवून अतिरिक्त सर्व्हर बसविण्याचे कामकाज शासन स्तरावर सुरु आहे व ते कामकाज येत्या २ दिवसात पूर्ण होणार आहे. त्यामुळे दाखले वितरणाचे काम येत्या २ दिवसानंतर सुरळीत सुरु होत आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा प्रशासनामार्फत प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.  महसूल प्रशासनामार्फत दाखले वितरीत करण्याबाबत कामकाज केले जाते. प्राप्त अर्जांवर महसूल कार्यालयीन कर्मचारी व अधिकाऱ्यांना कार्यालयीन वेळेपूर्वी व कार्यालयीन वेळेनंतर ज्यावेळी सर्व्हर गतिमान असेल त्यावेळी कार्यालयात उपस्थित राहून दाखले...

आषाढी वारीचे अपडेट वाचा,,,

अकलूज ता.२५:संत तुकाराम महाराज यांची पालखी अकलूजवरून निघाल्यावर माळीनगर येथे पहिले उभे रिंगण पार पडणार आहे.  उभे रिंगण संपन्न झाल्यावर पालखी बोरगावच्या दिशेने प्रस्थान ठेवणार असून बोरगाव येथे तुकोबारायांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे.  संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी माळशिरसहून पहाटे प्रस्थान ठेवले आहे. त्यानंतर खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण पार पडणार आहे. रिंगण सोहळा संपन्न झाल्यावर माउलींची पालखी वेळापूरच्या दिशेने पस्थान ठेवणार असून पालखीचा वेळापूर येथे मुक्काम असणार आहे.

अखेर महाराष्ट्रात मान्सून सक्रीय

मुंबई ता.२५:मुंबईसह दिल्लीत मान्सून सक्रिय झाल्याची घोषणा हवामान विभागानं केली आहे. मुंबईत पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. असा जोरदार पाऊस सुरु राहिला तर पुन्हा मुंबईच्या सखल भागामध्ये पाणी भरुन जाणार आहे. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचण्यात सुरुवात झाली आहे.  दरम्यान राज्याच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे. कुठं हलका ते मध्यम स्वरुपाचा तर कुठे जोरदार पाऊस कोसळत आहे.राज्यातील वाशिम, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, पालघर, वसई विरार, कोल्हापूर या भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. तर काही ठिकाणी नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले. सध्या दिल्लीसह उत्तर भारतात जोरदार पाऊस पडत आहे.

पाऊस होऊन येईन तुझ्याच भेटीला

.          * तुझी भेट*                                                 पाऊसाचा थेंब होऊन तुझ्या भेटीला याव म्हणतो एकदा,,,.                                                    त्यावेळी तरी तू भेटशील का अंगणात मला,,,.             प्रेमात मनसोक्त भिजवेन तुला,,                   ओलेचिंब करून कवेत घेईन तुला,,,                       मी आवडलो नाही तुला,, म्हणून हरकत  नाही तुला घराच्या आडोशाला जायला,,,                               मी आपला मनसोक्त कोसळेन तुझ्याच अंगणात,,.  ...

अडीच हजार तरुणांना कृषी विभागात नोकरीची संधी

मुंबई-राज्याच्या कृषी विभागातील कृषी सेवकांच्या रिक्त असलेल्या २ हजार ५८८ जागांपैकी २ हजार ७० जागा लवकरच भरल्या जाणार आहेत. या रिक्त जागा सरळसेवेच्या कोट्यातील असल्याने आणि या संवर्गातील रिक्त पदांचा आकृतिबंध अद्याप अंतिम झालेला नसल्याने, एकूण रिक्त जागांपैकी ८० टक्के जागाच भरण्यात येत आहेत. यानुसार कृषी विभागाच्यावतीने २ हजार ७० जागांच्या भरतीच्या परवानगीसाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावास राज्य सरकारची मंजुरी मिळताच, याबाबतची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचे राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे.कृषी आयुक्तालयाच्या अखत्यारित येत असलेली ‘गट-क’ मधील विविध संवर्गातील पदांची भरती प्रक्रिया याआधीच सुरु करण्यात आली आहे. या पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच ‘पेसा’ क्षेत्रातील रिक्त पदे निश्चित करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली असल्याचे चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले. सुधारित आकृतिबंध अद्याप अंतिम झाला नसल्यामुळे याबाबतच्या अध्यादेशातील तरतुदीनुसार वाहनचालक व गट-ड संवर्गातील रिक्त जागा वगळून सरळसेवा कोट्यातील अन्य रिक्त पदां...

"रडायचं नाही, आत्ता लढायचं", देशमुखाच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्यात निर्धार

आटपाडी -जिल्हा बँक, बाजार समिती आणि कारखाना या दोन-तीन निवडणुकीत अपयश आले म्हणून खचून जायच नाही आणि चुळबुळही करायची नाही. भाजप पक्षासोबतच निष्ठेने राहुन पुन्हा नेटाने उभा राहून लढून गतवैभव मिळवण्यचा  निर्धार देशमुख गटाच्या कार्यकर्त्यांनी मेळाव्यात आज केला.                                                 भाजपचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आणि भाजप विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख अमरसिंह देशमुख यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. निवडणुकीतील जिल्हा बँक आणि बाजार समितीच्या निवडणुकीतील पराभव, कार्यकर्त्यांत आलेली मरगळ आणि त्यांच्या भावना लक्षात घेण्याच्या दृष्टीने मेळाव्याचे आयोजन केले होते. श्रीमंत बाबासाहेब देशमुख सूतगिरणीवर मेळावा पार पडला. तालुक्यातून देशमुख गटाचे ज्येष्ठ नेते मंडळी पासून तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या प...

आवडीचे आणि कौशल्याचे क्षेत्र करियर म्हणून निवडावे

शेटफळे--- विद्यार्थ्यांनी स्वतःची आवड, कौशल्य आणि प्राविण्य लक्षात घेऊन तेच क्षेत्र करियरसाठी निवडावे असे प्रतिपादन सेंटर फॉर करिअर कौन्सलिंग बारामतीच्या अध्यक्षा अँड. सारिका पाटील यांनी केले.    शेटफळे तालुका आटपाडी येथे ध्येय दिशा संस्कार पेरणी प्रतिष्ठानने विद्यार्थ्यांच्यासाठी करिअरची निवड या विषयावर सारिका पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते यावेळी त्या बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शारदा गायकवाड होत्या. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा संभाजी गायकवाड, अध्यक्ष सुनील गायकवाड, डॉ. अंजली कदम, डॉ. नारायण कदम, पतंगराव गायकवाड प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिष्ठानच्या कविता गायनाने झाली. त्यानंतर दहावी, बारावी आणि सीईटी मध्ये विशेष गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. अँड. पाटील यांनी शालेय विद्यार्थ्यांना अत्यंत सोप्या भाषेत त्यांच्याशी सुसंवाद ठेवत करिअरची निवड या विषयावर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या,"विद्यार्थ्यांनी दहावीपर्यंत फक्त शिक्षणावरच लक्ष केंद्रित करावे. त्यावेळी कोणत्या क्षेत्रात निवडावा त्याचा जर...

यंदाची पाणी परिषद आटपाडी ऐवजी "इथे" होणार

आटपाडी --कृष्णा खोऱ्यातील तेरा दुष्काळी तालुक्याची यंदाची 31 वी पाणी परिषद मंगळवेढा येथे 26 जुनला प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती पाणी परिषदेचे निमंत्रक वैभव नायकवडी यांनी दिली.            क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी 1993 मध्ये पहिल्यांदा आटपाडी तालुक्यात 13 दुष्काळी तालुक्यांची पाणी परिषद घेतली होती. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी आणि कै. गणपतराव देशमुख यांनी दुष्काळी तालुक्यांना सिंचन योजना चे पाणी द्यावे यासाठी राज्य सरकारचे संघर्ष चालू केला. दुष्काळी तालुक्यांना कृष्णा खोऱ्याचे पाणी द्यावे, अशी प्रमुख मागणी पाणी परिषदेच्या व्यासपीठावरून केली जात होती. क्रांतिवीर नागनाथअण्णा नाईकवडी यांच्या पश्चातही पाणी परिषदा सुरू असून आत्तापर्यंत तीस पाणी परिषदा झाल्या आहेत. या पाणी परिषदेच्या माध्यमातूनच अनेक मोर्चे, बहिष्कार आणि विविध प्रकारची आंदोलने उभारली गेली. पाणी परिषदेच्या लढ्याची दखल घेऊन राज्य सरकारने दुष्काळी भागांना पाणी देणाऱ्या उपसा सिंचन योजना मंजूर देऊन प्रत्यक्ष कामे सुरू केली. अनेक योजनांची का...

केसी.आर. राव आणि प्रकाश आंबेडकर महाराष्ट्र एकत्र येणार?

मुंबई-- काही दिवासांपासून महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरांपासून ते गावांपर्यंत एकाच व्यक्तीचे फ्लेक्स दिसून येतायेत. ‘अबकी बार किसान सरकार’ असं लिहिलेले फ्लेक्स नाक्यानाक्यावर लागायला सुरुवात झाली आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे महाराष्ट्रातल्या एखाद्या नेत्याचे फ्लेक्स असतील, तर ते तसं नाहीये. हे फ्लेक्स आहेत तेलंगाणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समिती पक्षाचे सर्वेसर्वा केसी राव यांचे. येत्या लोकसभा आणि विधानसभेच्या आधी केसीआर महाराष्ट्रात पाय रोवू पाहत आहेत. त्यातच केसीआर यांना वंचित बहुजन आघाडीची देखील साथ मिळू शकते. त्यामुळे केसीआर आणि वंचितचा नेमका कुणाला फटका बसू शकतो, हे दोन्ही पक्ष कुणासाठी घातक ठरू शकतात? हेच सामजावून घेऊयात…केसीआर यांनी नांदेडमध्ये सभा घेतली होती. या सभेला जोरदार प्रतिसाद मिळाला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधले अनेक नेते केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षात दाखल झाले. नांदेडसोबतच राज्यातील इतर ठिकाणी देखील त्यांनी सभा आणि विविध कार्यक्रम घेतले. आता आषाढी वारीला देखील विठ्ठलाच्या दर्शनाला केसीआर येणार आहेत. केसीआर यांच्या पंढरपूर दौऱ्या...

पट्ट्याने, चार एकरातून केळीचे 35 लाखाचे उत्पादन काढले

करमाळा-- अलिकडे अनेक दडपडे तरुण शेतकरी शेतीत नवनवीन यशस्वी प्रयोग करताना दिसू लागलेत. पारंपारिक पद्धतीनं शेती न करता आधुनिक पध्दतीनं शेती करत भरघोस उत्पादन घेऊ लागलेत. काही उच्चशिक्षीत तरुणानीही नोकरीच्या मागे न लागता यशस्वी शेती करत असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. अशाच एका सिव्हिल इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलेल्या तरुणानं 'लाल केळी'च्या शेतीचा यशस्वी प्रयोग  वाशिबे ता. करमाळा जि.सोलापूर येथे केला आहे. अभिजीत पाटील या तरुण अभियंता शेतकऱ्याचे नाव आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालक्यातील वाशिंबे या गावचा तो. त्यांनी लाल केळीचं यशस्वी उत्पादन घेतलं आहे. *नोकरीच्या मागे न लागता शेती करण्याचा निर्णय* अभिजीत पाटील हे करमाळा तालुक्यातील वाशिंबे गावचा तरूण. त्यांनी चार एकर क्षेत्रावर २०२० मध्ये लाल केळीची लागवड केली आहे. चार एकरातून त्यांनी आत्तापर्यंत 35 लाखांचं उत्पादन घेतलं आहे. हे उत्पन्न त्यांनी 13 महिन्यात घेतल आहे. गेल्या सात ते आठ वर्षापासून अभिजीत पाटील शेती करतात. पुण्यातील डी. वाय. पाटील महाविद्यालतून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं. त्यानंतर नोकरीच्या ...

आटपाडीतील श्री. गणेश नॉन एग्रीकल्चर को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्षपदी डॉ. विष्णू पाटील

आटपाडी ता.२३-येथील श्री. गणेश नॉन ॲग्रीकल्चर रुलर को- ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या अध्यक्षफदी डॉ. विष्णू पाटील यांची तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब सागर यांची एकमताने बिनविरोध निवड केली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम. बी. कुलकर्णी यांनी काम पाहिले.  2005 मध्ये कै. तानाजी केदार यांच्या प्रेरणातून सुरेश  चव्हाण यांनी गणेश पतसंस्थेची स्थापना केली होती. संस्थेचे खेळते भाग भांडवल पाच कोटी असून  तीन कोटी साठ लाख ठेवी आहेत. तर कर्ज तीन कोटी 20 लाखाचे वाटप केले आहे. एकूण गुंतवणूक 55 लाख आहे. ऑडिट वर्ग 'अ' सतत आहे. मार्च 2023 अखेर तीन लाख 25 हजार नफा झाला आहे. स्वतःचे लॉकर, सोने तारण कर्ज सुविधा व अन्य कर्ज योजना राबवल्या आहेत. संस्थेची स्थापनेपासून बिनविरोध निवडणूकीची परंपरा आहे. ती यंदाही कायम ठेवली. संचालकांची निवड बिनविरोध झाली.यात  बापूराव मगर, महादेव चव्हाण, आनंदराव पाटील, सर्जेराव चव्हाण, स्वाती देशपांडे, छाया अवताडे,शुभम सित्रे, ब्रह्मदेव माने यांची निवड बिनविरोध झाली. संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. विष्णू पाटील यांची तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब सागर यांची एकमतान...

सांगलीत इडीचे छापे

सांगली-- शहरातील एका मोठ्या उद्योगपतीच्या बंधूच्या घरावर इडीने आज पहाटे छापा टाकला. या छाप्याने सांगलीत खळबळ उडाली आहे.           आज पहाटे पाच वाजताच इडीचे अधिकारी दोन पथकातून सांगलीत दाखल झाले सांगलीतील त्रिकोणी बागेत वास्तव्यास असलेल्या उद्योगपतीच्या दोन बंगल्यावर हे छापे टाकले आहेत. हे दोन्ही बंगले सांगलीतील नामवंत दोन उद्योगपती बंधूची आहेत. त्यांचे इलेक्ट्रॉनिक्स व्यवसाय क्षेत्रात नाव आहे. व्यवसायातील अनियमित्ता आणि संस्था उलाढाली केल्याने ही कारवाई केल्याचे समोर येत आहे. इडीच्या दोन पथकाने दोन बंगल्यावर छापा टाकून कागदपत्राची तपासणी सुरू केली आहे. तसेच अनेकांचे जबाब घेण्याचे काम सुरू केले आहे. या दोन्ही बंगल्याच्या बाहेर एसआरपीचे जवान तैनात केले आहेत. याबाबत इडीच्या अधिकाऱ्यानी अद्याप अधिकृत दुजोरात दिलेला नाही.

रक्तदान करण्यासाठी सांगलीतून एक हजार पोरं दिल्लीला घेऊन जाण्यासाठी 'यांनी' चक्क रेल्वेच बुक केली

कुस्तीचा आखाडा गाजवून सामाजिक कार्याच्या आखाड्यात उतरलेल्या पै. चंद्रहार पाटील 12 ऑगस्टला दिल्लीला एक हजार पोरं रक्तदानासाठी घेऊन जाणार आहे त्यासाठी त्याने चक्क पूर्ण एक रेल्वेज बुक केली आहे. सांगली  जिल्हा हिऱ्यांची खान असणारा जिल्हा आहे. अस जुनी जाणती माणस म्हणायची. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिसिंहनाना पाटील, यांच्यापासून ते वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, जी.डी.बापू लाड, आर. आर. पाटील, डॉ. पतंगराव कदम, पैलवान मारुती माने अशी सुरू झालेली परंपरा आजही कायम आहे. जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असणारे तरुण कमी नाहीत.  समृद्ध वारसा युवकांनी जपल पाहिजे. त्याच ध्येयाने प्रेरित होऊन डबल महाराष्ट्र केसरी विजेता मल्ल चंद्रहार पाटील धडाडीने सामाजिक कार्यात काम करू लागला आहे. जिल्ह्याचे नाव वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवावं हाच संकल्प आणि जिद्द घेऊन दंड थोपटून हा मातीतला पुत्र बाहेर पडला आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये दोन वेळा बहुमान मिळवून जिल्ह्याचे नाव राज्यभर केले. कुस्तीच्या आखाड्यातून बाहेर पडल्यानंतर त्यानी नवीन पैलवान घडवण्यासाठी राज्यातील सर्वात मोठी ताली...

शरद पवारांच्या समोर अजितदादा म्हणाले "मला मुक्त करा"

    मुंबई-विरोधी पक्षनेते अजित पवार हे रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आज मुंबईत झालेल्या मेळाव्यातही त्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील नेत्यांना कानपिचक्या दिल्या. त्याचवेळी आता मला विरोधी पक्षनेतेपदावरून मुक्त करा,अशी मागणी केली आहे. मला या पदावरून मुक्त करून संघटनेत कोणतेही पद द्या आणि मग बघा पक्ष कसा चालतो अशा शब्दांत अजितदादांनी आपली इच्छा बोलून दाखवली आहे. आज मुंबईत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त मेळावा पार पडला. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्याचवेळी पक्ष संघटनेच्या कामाबद्दलही परखड मते व्यक्त केली. पक्षातील नेत्यांना कानपिचक्या देत त्यांनी आपण स्वबळावर सत्ता का आणू शकलो नाही याचं आत्मचिंतन केलं पाहिजे असंही मत व्यक्त केलं. मी गेली वर्षभर विरोधी पक्षनेते पदावर काम करतो आहे. मुळात मला यात कोणताही रस नव्हता. मात्र वरिष्ठांच्या सुचनेनंतर आपण हे पद घेतलं. काहीजण म्हणतात मी कडक बोलत नाही. आता क...

आटपाडीच्या तहसीलदारानी मॅट मध्ये जाऊन अवघ्या चार दिवसात पुन्हा मिळवली तीच खुर्ची

आटपाडी-- आटपाडी महसूल विभागातील तहसीलदार पदाच्या खुर्चीसाठी बदली झालेल्या तहसीलदार बी. एस. माने यांनी अवघ्या चार दिवसांमध्ये मॅटमध्ये (न्यायधिकार) जाऊन स्थगिती मिळवली. आटपाडी महसूल विभागाच्या इतिहासातील हा पहिलाच प्रकार असून महसूल आयुक्तांच्या बदली आदेशाविरोधात स्थगिती मिळवली आहे. या साऱ्या बदलीच्या प्रकरणाची लोकात मात्र रंगतदार आणि कुमार चर्चा रंगली आहे.                        आटपाडीच्या तहसीलदार बी. एस. माने यांच्या बदलीचा आदेश 15 जून रोजी महसूल आयुक्तांनी काढला होता. त्यांच्या जागी सचिन मुळी यांच्या नियुक्तीचाही आदेश काढला होता. तहसीलदार माने यांची आटपाडीत बदली होऊन 25 महिने झाली होती. कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याची तीन वर्षे बदली करता येत नाही. जर बदली केली असेल तर त्या विरोधात मॅटमध्ये दात मागीतली जाते. आटपाडी मध्ये महसूल, पोलीस प्रशासन आणि पंचायत समितीच्या शासकीय कार्यालयात अनेक अधिकाऱ्यांच्या तीन वर्षाच्या आत मध्ये बदल्या झालेल्या आहेत. मात्र यावेळी पहिल्यांदाच तहसीलदार बी.एस. माने यांनी मॅटमध्ये धाव घेऊन अवघ्या चार दिवसात...

शेतकऱ्यांचा अंत पाहू नका--डॉ. भारत पाटणकर यांचा ठेकेदार आणि प्रशासनाला इशारा

आटपाडी ता.21-  आमच्या संयमाचा अंत पाहू नका. कारणे तर अजिबात सांगू नका, शंभर शंभर किलोमीटरवर लांब चरी काढून माळावर पसरलेल्या पाईप 30 जुलै पर्यंत जोडून कामे तातडीने पूर्ण करावीत, अन्यथा 1 ऑगस्ट पासून पासून तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांसोबत बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा पाणी चळवळीने काढलेल्या मोर्चात आज दिला. मोर्चाचे नेतृत्व डॉ. भारत पाटणकर यांनी केले होते.        टेंभू योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनची रखडलेली कामे आणि वंचित गावांना नविन सुधारीत प्रशासकीय मान्यता देऊन कामे सुरू करावीत, या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दल आणि पाणी चळवळीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. बसस्थानक पासून मोर्चाची सुरूवात केली. मुख्य पेठेतून जोरदार घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला. मोर्चात आनंदराव पाटील, हणमंतराव देशमुख, साहेबराव चवरे, जनार्दन झिंबल आदी सहभागी झाले होते. तहसील कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर तिथे आनंदराव पाटील, मनोहर विभुते, प्रा.विजय शिंदे,साहेबराव चवरे, हणमंतराव देशमुख यांची भाषणे झाली. डॉ. भारत पाटणकर यांनी यावेळी मोर्चातील प्रमुख नेते मंडळींची भा...

आटपाडी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी उत्तम बालटे

आटपाडी ता. 20- येथील आटपाडी क्रेडिट को-ऑफ क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी उत्तम बालटे तर उपाध्यक्षपदी सोमनाथ जाधव यांची बिनविरोध निवड झाली.                                          पाच वर्षांपूर्वी संस्थापक अध्यक्ष उत्तम बालटे यांनी आटपाडीकरांची गरज लक्षात घेऊन आटपाडी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना केली होती. संस्थेची आटपाडीत एक शाखा आहे. अडीच कोटी वर ठेवी आहेत. सहाय्यक निबंध विभागातील अधिकारी उदय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी बी. एस. बारवकर प्रमुख उपस्थित होते.संस्थेच्या सदस्यांची निवड बिनविरोध झाली. यात दादासो पुजारी, प्रशांत माळी, बॅरिस्टर मुलांनी, रणजीत ऐवळे, स्वप्निल टकले, रवींद्र सागर, अर्जुन लांडगे, वैशाली बालटे, रूपाली बालटे या सदस्यांची निवडणूक बिनविरोध झाली.त्यानंतर संस्थेच्या अध्यक्षपदी उत्तम बालटे आणि उपाध्यक्षपदी सोमनाथ जाधव यांचे एकमेव अर्ज दाखल असल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोघांचीही निवड बिनविरोध जाही...

सांगली जिल्हा पुन्हा दोन खुनाने हादरला

सांगली-अखंड सांगली जिल्हा एकाच दिवसात दोन झालेल्या खुनामुळे पूर्ण हादरून गेला आहे. गेल्या महिन्याभरापासून खून, खुनी हल्ला, जबरी चोरी आणि दरोड्याची मालिका काही केल्या थांबता थांबेना. त्यातच काल मिरज तालुक्यात कसबे डिग्रज येथे भाजी विक्रेत्याचा आणि बेडग येथे चुलत भावाचा खून केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे .                                     गेल्या महिन्याभरापासून सांगली जिल्ह्यात खुनाच्या मालिकाचे सत्र सुरू झाले आहे. जत, मिरज आणि सांगली शहरात हे खुनाचे सत्र सुरू आहे. पूर्ववैमानस्य आणि इतर वैयक्तिक किरकोळ कारणातून या खुनाच्या घटना घडल्या आहेत. बहुतांश खुनात तरुण पोरच सहभागी आहेत. या घटनेने जिल्ह्यातील नागरिकासह पोलीस प्रशासनही हादरून गेले आहे. चार दिवसापूर्वी सांगलीत  एका गुंडाचा अवघ्या 20 ते 22 वर्षाच्या पोरांनी गोळ्या झाडून खून केल्याची घटना ताजी असताना मिरज तालुक्यात कसबे डिग्रज आणि बेडग मध्ये दोन खून झाल्याने खुनाची मालिका सुरूच राहिली आहे. बेडग येथे बेडग ते मल्ले...

पावसाची प्रतीक्षा संपता संपेना

आटपाडी - गेली चार वर्षे मान्सूनचा पाऊस वेळेवर होत असल्यामुळे खरिपाच्या पेरणीची शेतकऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे. मात्र यंदा पाऊस झाला नसल्यामुळे खरिपाच्या पेरण्या थांबल्या आहेत. खरिपाच्या पेरणीसाठी बळीराजा पावसाकडे डोळे लावून बसला आहे.                                                                गेली चार वर्ष आटपाडी तालुक्यात मान्सून पाऊस बऱ्यापैकी कोसळत होता. दुष्काळी भागात गत चार वर्षे पावसाने सरासरी पेक्षा जास्त हजेरी लावली आहे. जोडीला टेंभू योजनेचे पाणी आल्यामुळे ओलीताखालील क्षेत्र वाढले आहे. वेळेवर येणारा पाऊस आणि टेंभूच्या पाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पिकाचा पॅटर्न बदलून शेतात नवनवीन प्रयोग सुरू केलेत. यंदा मात्र परिस्थिती गंभीर निर्माण झाली आहे. खरिपाच्या पेरणीसाठी बहुतांश शेतकऱ्यांनी शेतीची नांगरट, कुळवट यासारखी अंतर्गत मशागतीची कामे करून आणि खते घालून पेरणीसाठी शेतकरी सज्ज झाला आहे. याशिवाय उन्हाळी हंगामात द...

आटपाडी बाजार समितीच्या डाळिंब लिलावात "या"साठी केले क्रेट मागे दहा रुपये कमी

आटपाडी - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब सौदे बाजारात आडतदाराची व्यापाऱ्याकडून प्रत्येक क्रेटमागे दहा रुपयाची चुकीची आकारणी अनेक वर्षापासून सुरू होती. नूतन सभापती संतोष पुजारी यांनी व्यापारी आणि आडतदारांची बैठक घेऊन क्रेट मागे दहा रुपयाची चुकीची आकारणी कायमची रद्द करण्याचा निर्णय घेतला.                                                  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेली पंधरा वर्षे डाळिंबाचा सौदे बाजार भरतो. पहिले काही वर्षे आठवड्यातून तीन दिवस लिलाव होत होता. त्यानंतर शनिवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस बाजार सुरू केला. त्याचा चांगला परिणाम झाला. आडतदार शेतकऱ्याकडून अनेक आकारणी करत होते. त्याला शेतकऱ्यातून तीव्र विरोध झाल्यानंतर ती आकारणी बंद करून शेतकऱ्याकडून फक्त हमाली आणि तोलाई रक्कम घेण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला होता. त्याची अंमलबजावणीही सुरू होती.                      ...

शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, पंजाबराव डंख यांनी सांगितली पावसाची तारीख,,

पुणे-- मान्सून बाबतची शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी पुढे आलेली आहे, हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी मान्सून 25 जून ते 15 जुलै पर्यंत चा अंदाज वर्तवलेला आहे. महाराष्ट्र मध्ये मान्सून कधी दाखल होणार याची प्रतीक्षा शेतकरी करत आहे. हवामान खात्याअंतर्गत मान्सूनचे आगमन महाराष्ट्रामध्ये 11 जूनला झाले असे घोषित करण्यात आलेली होते, परंतु त्यानंतर महाराष्ट्र मध्ये मान्सून ने पलटी मारली. व त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता लागलेली होती की मान्सून केव्हा येणार. मान्सून महाराष्ट्रात न आल्याने ज्या शेतकऱ्यांनी शेतामध्ये पिकांची पेरणी केलेली आहे असे शेतकऱ्यांना मात्र खूप काळजी लागून राहिलेली होती, परंतु हवामान अभ्यासक पंजाबराव डखं यांनी 25 जून ते १५ जुलै पर्यंत मान्सूनचा अंदाज वर्तवलेला आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र मध्ये मान्सून येणार असे अंदाज वर्तवण्यात येत होती परंतु मान्सून मुख्य कारण म्हणजे मधेच आलेले चक्रीवादळ आहे. चक्रीवादळ आल्यामुळे मान्सून सक्रिय होण्यास अडचणी निर्माण झाल्या. व अशा परिस्थितीमध्ये मान्सून दाखल होण्यास वेळ लागत आहे. *या तारखे दरम्यान महाराष्ट्रात जोरदार पाऊस* हवामान अ...

अहमदनगर मधील एच.आय.व्ही. ग्रस्त आणि सेक्स वर्करच्या मुलांची शाळा जगात भारी,, वर्ल्ड टॉप फाइव्ह मध्ये

जगातील सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार जाहीर झाले आहेत. यावर्षी भारतीतील पाच शाळांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये अहमदनगर येथील एचआयव्हीग्रस्त आणि सेक्स वर्करच्या मुलांच्या शाळेने क्रमांक पटकावला आहे. सोबत दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्रातील शाळांचाही समावेश आहे. या यादीत महाराष्ट्रातील तीन शाळांचा समावेश आहे. सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कारच्या माध्यमातून तब्बल अडीच लाख डॉलरचे (US$ 2,50,000) बक्षिस मिळणार आहे. हा पुरस्कार जगभरातील शाळांच्या समाजाच्या प्रगतीमध्ये शाळांचे योगदान पाहून देण्यात येतो.  जागतिक सर्वोत्तम शाळा पुरस्कारासाठी विविध श्रेणींमध्ये टॉप 10 च्या यादीत निवडण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातील तीन शाळांचा समावेश आहे. जगातील सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार 5 श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत. यात समुदाय सहयोग, पर्यावरण कृती, नवीन उपक्रम, प्रतिकूलतेवर मात करणे आणि निरोगी जीवनास समर्थन देणे यांचा समावेश आहे. या पुरस्काराच्या सहाय्याने समाजाच्या पुढील पिढीच्या विकासात महत्त्वाच्या भूमिकेसाठी शाळांना प्रोत्साहन दिले जाते. *या भारतीय शाळांचा समावेश* पुरस्कार मिळालेल्या शाळांमध्ये दिल्ली, गुजर...

विद्यार्थ्यांच्या दाखल्यासाठी आमदार अनिलभाऊनी धोरणच बदलून दाखवल

विदयार्थांच्या दाखल्यासाठी आमदार बाबर धावले... अन चक्क राज्याचेच धोरण बदलले थेट मुख्यमंत्री व प्रधान सचिवांना केला फोन शाळा, महाविद्यालये सुरू होत असताना विद्यार्थांना त्यांचे दाखले मिळण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. अबालवृध्दांच्यात लोकप्रिय असणारे आमदार अनिलभाऊ बाबर यांनायासाठी असंख्य विद्यार्थी व विद्यार्थीनीचे फोन येत होते. अनेकजण भेटत होते, पालक देखिल ही समस्या मांडत होते. अखेर आमदार अनिलभाऊंनी विटयाचे तहसिल कार्यालय गाठले, दाखले मिळण्यासाठी कोणत्या त्रुटी आहेत समजून घेतल्या आणि जागेवरूनच थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व प्रधान सचिव विकास खारगे यांना फोन केला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची तीव्रता समजून सांगितली मुख्यमंत्री शिंदे यांनीही तात्काळ दखल घेतली अन दाखले देण्यासाठी राज्यासाठी लागू केलेले फिफो हे  धोरण चक्क आमदार बाबर यांच्या एका फोनवरच बदलून घेतले.         आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या कार्यपध्दतीबाबत तरूणाईत  मोठी क्रेझ आहे. रात्री अपरात्री एका साध्या फोनवर आपले काम करणारे आमदार म्हणून अनिलभाऊंची लोकप्रियता आहे. त्यामुळेच आमदार अनिलभा...

पाणी चळवळीचा मंगळवारी "या" मागणीसाठी तहसीलवर मोर्चा

आटपाडी - टेंभू योजनेच्या बंदिस्त पाईपलाईन पथदर्शी प्रकल्पाच्या पाईपाची जोडणी करून चरीत बुजवून आराखड्याप्रमाणे आउटलेट काढून तेथून प्रत्यक्षात पाणी चालू करावे आणि वंचित गावांचा अंदाजपत्रक तयार करून तातडीने निधी द्यावा, यासाठी मंगळवार ता. 21 जून रोजी डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे अहवाल पाणी चळवळीचे नेते आनंदराव पाटील यांनी केले आहे.                         मंगळवार ता. 21 रोजी सकाळी दहा वाजता हा मोर्चा बस स्थानकापासून निघणार आहे. मोर्चाच्या तयारीच्या दृष्टीने आनंदराव पाटील यांनी गावोगावी भेटी देऊन शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. आटपाडी तालुक्यात टेंभूवर बंदिस्त पाईपलाईनने पाणी शेतीला देणारा पददर्शी प्रकल्प राबवला आहे. याची 80 टक्के कामे पूर्ण झालीत मात्र अत्यंत महत्त्वाची शेवटच्या टप्प्यातील  कामे थांबली आहेत. संपुर्ण तालुकाभर  पाईपाच्याचरी काढल्या आहेत. पाइपाही अनेक महिन्यांपासून उघड्यावर उन्हात टाकल्या आहेत. त्या जो...

पी. एम. किसान सन्माननिधी कधी जमा होणार ते वाचा

मुंबई- जूनच्या तिसऱ्या आठवड्यात PM किसान सन्मान निधीचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याच्यासोबतच राज्याचाही सन्मान निधी जमा केला जाणार आहे मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप कागदपत्रांची पूर्तता केली नाही, त्या शेतकऱ्यांच्या खात्यात 14 वा हप्ता जमा होणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी आधार कार्ड अपडेट केले नाही, त्या शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  *23 जूनपर्यंत कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन* ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण केली नाही, त्या शेतकऱ्यांनी 23 जूनपर्यंत कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. जे शेतकरी आधीच किसान सन्मान निधी योजनेशी निगडीत आहेत आणि त्यांचे ईकेवायसी पूर्ण झाले नाही, अशा शेतकऱ्यांनी पूर्तता करणं गरजेचं आहे. यासोबतच या योजनेत नुकतेच सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी देखील ई केवायसी करणे बंधनकारक आहे.  ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी, आधार कार्ड अपडेट केलेले नाहीत, त्यांच्याकडे 23 जूनपर्यंत...

आटपाडी तालुक्यात 'या' ठिकाणी होणार अंगणवाडी सेविका आणि मदतनीची भरती

आटपाडी ता.१७-ज्ञआटपाडी तालुक्यात सहा मिनी अंगणवाडी सेविकांची आणि बत्तीस मदतनीस अशी ३८ पदाची भरती प्रक्रिया एकात्मिक बाल विकास सेवा योजनेने सुरू केली आहे. सोमवार ता. 19 जून पासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.                आटपाडी तालुक्यात 191 अंगणवाडीची संख्या आहे. यातील सहा मिनी अंगणवाडीतील अंगणवाडी सेविकांची पदे अनेक वर्षापासून रिक्त होती तसेच 32 अंगणवाडीमध्ये मदतनीसची पदे रिक्त होती. त्यामुळे सहा अंगणवाडीमध्ये पालक त्यांच्या विद्यार्थ्यांना पाठवत नव्हते तसेच मदतनीची पदे रिक्त असल्यामुळे तेथील अंगणवाडी सेविकावर कामाचा बोजा वाढला होता. ही पदे भरण्याची अनेक वर्षापासून मागणी होती. अखेर राज्य सरकारच्या आदेशाने एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाने रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सोमवार ता. 19 जून ते तीन जून या कालावधीत बालविकास प्रकल्प कार्यालयामध्ये अर्ज दाखल करण्याची मुदत जाहीर केली आहे. यासाठी किमान बारावी पास असण्याची अट घातली आहे. तसेच इतरही अटी आणि शर्ती लागू केल्या आहेत. यात दिघंची केंद्र क्रमांक 24, पुसावळवस्ती केंद्...

वाढत्या वयात,, तारुण्य खुलते

*वाढते वय आणि कार्यक्षमता* वयाची साठी आली, की अध्यात्माच्या मार्गाला लागणाऱ्या तळेगाव किंवा अलिबागच्या 'सेकंड होम' कडे वळणाऱ्या आणि आयुष्याची संध्याकाळ आली म्हणून निवृत्तीचे वेध लागलेल्या पिढीचे डोळे उघडणारे एक संशोधन नुकतेच 'न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन' या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनातून समोर आलेले निष्कर्ष आपल्या आजवरच्या समजुतींना धक्का देणारे आहेत. आपण ज्या क्षेत्रात आहोत, तिथे सर्वाधिक उत्तम कार्यक्षमतेचा काळ कुठला असू शकतो, असे विचारल्यास आपण अर्थातच तरुण पिढीचा विचार करतो. हा अभ्यास मात्र वेगळेच काही सांगतो. मानवी जीवनातला सर्वाधिक दर्जेदार कार्यक्षमतेचा काळ हा विशी आणि तिशीत नसतो, चाळिशीतही नसतो, तर तो साठी आणि सत्तरीत असतो. या पुढे जाऊन हा अभ्यास म्हणतो, की दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक कार्यक्षमता वयाच्या ७० ते ८० या दशकादरम्यान असते. ५० ते ६०च्या दशकाचा क्रमांक त्यानंतर लागतो. हे ऐकून अर्थातच आश्चर्य वाटते. आपल्या आजूबाजूला गुडघे दुखत असलेले, मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी सज्ज असलेले, पाठदुखीने त्रस्त असणारे वृद्ध दिसत असतील, तर त्यांकड...

जिल्ह्यातील एक ही गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही: पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली : सद्यस्थितीत पाऊस लांबला आहे. अलनिनोचे संकट आले तर जुलै अखेर पुरेल एवढा पिण्याच्या पाण्याचा साठा कोयना धरणात ठेवण्यात आला आहे. माणसे आणि जनावरे यांच्या पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आल्याने टप्प्याटप्प्याने उपसा बंदी करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत शेतीला पाण्याचा पुरवठा करणे अवघड असून जनतेने पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.  ताकारी, टेंभू, म्हैसाळ, आरफळ  या योजनांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील, उपजिल्हाधिकारी विजया पांगारकर, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, म्हैसाळ २ उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता  सचिन पवार, टेंभू उपसा सिंचन १ चे कार्यकारी अभियंता अभिनंदन हरूगडे, ताकारी उपसा सिंचन योजनेचे राजन डवरी, टेंभू उपसा सिंचन योजना २ चे उपविभागीय अभियंता सुशील गायकवाड व ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे उप...

भामट्याने नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना लावला चुना

आटपाडी - मुंबई येथे माथाडी मध्ये नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून तरूणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी लेंगरेवाडी येथील दादासाहेब जानकर यांच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.           याबाबत पोलिसांनी आणि फसवणूक झालेल्या तरुणांनी अधिक माहिती दिली. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनीही या गंभीर प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपीवर कडक कारवाई करून तरुणांना न्याय देण्याची मागणी केली आहे. जांभुळणी येथील पोपट घुटुकडे, बाजीराव घुटुकडे आणि बनपुरी येथील दिगंबर यमगर या तिघा तरुणांनी नोकरीचे आमिष दाखवून दादासाहेब जानकर यांनी साडेसहा लाखाची फसवणूक केल्याची तक्रार आटपाडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. गेल्या वर्षी दादासाहेब जानकर त्यांच्या संपर्कात आला होता. तो मुंबईत वास्तव्य करतो. त्याचे मूळ गाव लेंगरेवाडी ता. आटपाडी आहे. मुंबईत एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे सांगून अनेक नेतेमंडळीशी जवळचा संबंध आहे. त्यामुळे तुम्हाला माथाडी मध्ये नोकरी लावतो असे या तरुणांना आमिष दाखवले होते. त्यासाठी अधि...