मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

रोम जळत होता,तेव्हा निरो फिडल वाजवत होता

   रोम  जळत होतं, तेव्हा निरो फिडल वाजवत होता…” रोमन सम्राट निरो बाबतची ही म्हण प्रसिद्ध आहे. रोममध्ये जाणीवपूर्वक आग लावण्याचा आरोप निरोवर केला जातो. फिडल हे एक तंतुवाद्य आहे. आपली आई, सावत्र भाऊ आणि पत्नींची हत्या घडवून आणणारा आणि दरबारातल्या किन्नरांसोबत लग्न करणारा एक क्रूर राज्यकर्ता अशी इतिहासात निरोची नोंद आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी निरो आईच्या प्रयत्नांमुळे राजगादीवर आला. साल होतं इसवी सन 54. या साम्राज्याच्या सीमा स्पेनपासून ते उत्तरेला ब्रिटन आणि पूर्वेला सीरियापर्यंत पोहोचलेल्या होत्या. निरोची आई अग्रिपीना हिला सत्तेची लालसा होती. कटकारस्थानं करत तिने निरोला सत्ता मिळवून दिली. अग्रिपीनाने तिचा काका सम्राट क्लॉडियसशी विवाह केला आणि त्याच्या लेकीशी निरोचं लग्न लावून दिलं. त्यामुळे निरो राजघराण्याचा सदस्य तर झालाच पण सोबतच राजाला स्वतःचा मुलगा असूनही निरो सम्राट क्लॉडियसचा उत्तराधिकारीही ठरला. अग्रिपीनाने सम्राट क्लॉडियसला विषारी मश्रूम म्हणजे अळंबी खायला घालून ठार केलं, असं म्हटलं जातं. पण यामध्ये कितपत तथ्य आहे, हे सिद्धं होऊ शकलेलं नाही

पराभवाच्या राखेतून दत्तात्रय पाटील यांची फिनिक्स भरारी

आटपाडी ता. 11- करगणी ग्रामपंचायती थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत निसटता पराभवाच्या राखेतून सावरून दत्तात्रय पाटील यांनी पंचायत समितीच्या निवडणुकीत तब्बल २८९५ मतांच्या फरकाने ऐतिहासिक विजय मिळवत फिनिक्स भरारी घेतली. तर करगणीला ज्येष्ठ नेते कै. अण्णासाहेब पत्की, कै. विजयसिंह पाटील आणि कै. सर्जेराव खिलारी यांच्या पश्चात चांगले सर्वसमावेशक नेतृत्व मिळाले.  ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने विरोधकांनी दत्तात्रय पाटील यांच्या राजकीय कारकीर्दवर शंका उपस्थित केली होती. मात्र, 'राजकारणात पराभव हा शेवट नसतो' हे पाटील यांनी सिद्ध केले. या विजयामुळे त्यांचे राजकीय वजन केवळ करगणी गणातच नव्हे तर संपूर्ण आटपाडी तालुक्यात वाढले आहे. भाजपचे तगडे उमेदवार संभाजी पाटील यांना केवळ ४२८२ मतांवर समाधान मानावे लागले. तर दत्तात्रय पाटील यांना मिळालेला ७१७७ मतांचा कौल दिला. ् या निवडणुकीतील सर्वाधिक मतांपैकी एक विजय मानला जात आहे. राजकीय समीकरणांमध्ये बदल दत्तात्रय पाटील यांचा हा विजय केवळ एक जागा जिंकण्यापुरता मर्यादित नसून, तो आगामी काळातील तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारा ठरण...

खरसुंडी जिल्हा परिषद गटाची गावनिहाय मतदान यादी

दिघंची जिल्हा परिषद गटातील गावनिहाय मतदान

घरनिकी ी पंचायत समिती गणातील गावनिहाय मते

निंबवडे जिल्हा परिषद गटातील गावनिहाय मतदार यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते

करगणी गणात गावनिहाय उमेदवारांना पडलेली मते

पहिल्या फेरी खरसुंडी गटात कोण आघाडीवर

पहिल्या फेरीत खरसुंडी जिल्हा परिषद गटात पडलेली खालील प्रमाणे मते जयदीप भोसले-- 4958 चंद्रकांत भोसले -3118----1840 चे मताधिक्य जयदीप भोसले यांना

आटपाडी तालुक्यात जिल्हा परिषद ा निवडणुकीची अशी होणारा मतमोजणी

आटपाडी ता. 8- आटपाडी तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गणांसाठी पार पडलेल्या मतदानाची मोजणीची  जय्यत तयारी पूर्ण केली असून 19 टेबल्सवर ही प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामध्ये एका टेबलावर टपाली आणि इतर 18 टेबलावर ईव्हीएम मशीन मतदानाची मोजणी केली जाणार आहे.  साधारण चार तासात सर्व निकाल स्पष्ट होतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी  समाधान शेंडगे आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शीतल बंडगर यांनी दिली.  मतमोजणीसाठी एकूण 19 टेबल्सची व्यवस्था केली आहे. यापैकी 18 टेबल्सवर ईव्हीएम  मशीनमधील मतांची मोजणी होईल, तर एक टेबल टपाली मतपत्रिकेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. संपूर्ण चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समितीची मतमोजणी प्रक्रिया एकूण 11 फेऱ्यांमध्ये पार पडणार आहे.  खरसुंडी जिल्हा परिषद गटात पासून मतमोजणीची सुरूवात केली जाणार. त्यानंतर अनुक्रमे करगणी, दिघंची आणि  सर्वात शेवटी निंबवडे गटांची मतमोजणी केली जाईल. साधारण एका गटाची मतमोजणी चार फेऱ्यात पूर्ण होईल. त्यासाठी एक तास वेळ जाऊ शकतो. चारही गटाची मतमोजणी दुपारी दोन पर्यंत पूर्ण होईल, असा प्राथ...

दिघंची गटातील प्रत्येक गावचा प्राथमिक अंदाज

आटपाडी ता. 5- आटपाडी तालुक्यातील दिघंची जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीने सध्या संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले आहे. या गटात शिवसेनेचे दिग्गज नेते व जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांचे सुपुत्र पृथ्वीराज पाटील आणि भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य कलाप्पा कुटे यांच्यात थेट आणि चुरशीची लढत होत आहे. दोन्ही उमेदवारांनी आपापल्या परीने ताकद लावल्याने निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. *गावनिहाय राजकीय गणिते आणि मतदारांचा कल:* मतदारांच्या प्राथमिक अंदाजानुसार, या गटातील गावांमध्ये संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. काही गावांमध्ये शिवसेनेचे पारडे जड दिसत आहे, तर काही ठिकाणी भाजपाला कौल मिळताना दिसत आहे. * शिवसेनेची (पृथ्वीराज पाटील) मजबूत पकड*: शिवसेनेसाठी कौठुळी, पुजारवाडी (आटपाडी) , पुजारवाडी ( दिघंची )आणि आवळाई या गावांमध्ये चांगले मताधिक्य मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच पळसखेल मध्ये मध्यम स्वरूपाची आघाडी मिळताना दिसत आहे. तानाजीराव पाटलांचा दांडगा जनसंपर्क आणि पृथ्वीराज पाटलांची तरुणांमधील क्रेझ याचा फायदा शि...

पिंपरी खुर्द मध्ये 'या' दिग्गज नेत्यानेे शिवसेना राष्ट्रवादीला दिला पाठिंबा

आटपाडी ता. 4- पिंपरी खुर्द आणि आंबेवाडीत आज खळबळ उडणारी राजकीय घटना घडली. गावचे माजी उपसभापती व माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचे खंदे कार्यकर्ते रुपेश पाटील आणि आंबेवाडीचे सुनील पुजारी यांनी राष्ट्रवादी–शिवसेना महायुतीचे उमेदवार विनायक मासाळ आणि रामदास सूर्यवंशी यांना आपला खणखणीत पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे पिंपरी आणि आंबेवाडी परिसरात विरोधकांच्या गोटात मोठी अस्वस्थता पसरली आहे. कार्यकर्त्यांचा निर्धार; प्रचारातही आघाडीवर केवळ पाठिंबा देऊन न थांबता, स्वतः प्रचारात आघाडीवर राहून विनायक मासाळ आणि रामदास सूर्यवंशी यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार रूपेश पाटील आणि सुनील पुजारी यांनी व्यक्त केला. या घडामोडींमुळे राजकीय पटलावर मोठी खळबळ उडाली असून महायुतीचे पारडे जड झाले आहे.                                                          पिंपरी खुर्दमध्ये 'भरती'; अनेक प्रमुख कार्यकर्त्यांचा प्रवेश याचवेळी अमित कद...

करगणी जिल्हा परिषद गटाचा गावनिहाय प्राथमिक अंदाज,,,,

आटपाडी (प्रतिनिधी) जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करगणी गटातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून गावनिहाय प्राथमिक अंदाज समोर येत आहेत. या गटात शिवसेना आणि भाजप यांच्यात थेट आणि चुरशीची लढत पाहायला मिळत असून, मतदारांचा कौल कोणाकडे झुकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.                                 *शिवसेनेचे 'वर्चस्व' आणि मताधिक्याची गावे * प्राथमिक अंदाजानुसार, शिवसेनेची पकड अनेक महत्त्वाच्या गावांमध्ये मजबूत दिसत आहे. विशेषतः करगणी, शेटफळे, मासाळवाडी, खानजोडवाडी आणि यपावाडी या गावांमध्ये शिवसेनेला मोठे मताधिक्य मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच पिंपरी गावात मध्यम स्वरूपाचे, तर माळेवाडी आणि तडवळे गावांतून थोड्या मताधिक्याचा कल शिवसेनेच्या बाजूने दिसत आहे. * भाजपाचीची या गावावर भिस्त* दुसरीकडे, भारतीय जनता पक्षालाही बोंबेवाडी गावात भाजपला मोठे मताधिक्य मिळण्याचे संकेत आहेत. माडगुळे गावात मध्यम स्वरूपाचे तर लेगरेवाडी आणि आंबेवाडी या गावांतून भाजपला निसटती आघाडी मिळण्याची च...

माजी मंत्री महादेव जानकर यांनी शिलेदारासाठी वाडीवस्ती पिंजून काढली

आटपाडी ता. ४-आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा आखाडा आता चांगलाच तापला असून, आपल्या एकनिष्ठ सहकाऱ्यांच्या विजयासाठी माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी कंबर कसली आहे. आपल्या शिलेदारांना जिल्हा परिषदेत पाठवण्यासाठी त्यांनी तालुक्यातील गावे आणि वाड्यावस्त्या पिंजून काढल्या असून, एका माजी मंत्र्याची आपल्या कार्यकर्त्यासाठीची ही धडपड पाहून मतदार अक्षरशः भारावून गेले आहेत .                              *रासपाच्या उमेदवारांसाठी मैदानात* खरसुंडी जिल्हा परिषद गटातून सत्यवान गलांडे, दिघंची गटातून संदेश खटके आणि करगणी गटातील रासपाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या उमेदवारांच्या प्रचारार्थ जानकर यांनी स्वतः मैदानात उतरून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. "प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी द्या," असे आवाहन त्यांनी यावेळी केले. वाड्यावस्त्यांवर थेट संवाद: महादेव जानकर यांनी आपल्या दौऱ्यात तळेवाडी, काळेवाडी, हिवतड, मानेवाडी, मेटकरवाडी, गोमेवाडी, अर्जुनवाडी, लेंगरेवाडी, मासाळवाडी,...

खरसुंडीत भाजपाचे जोरदार शक्ती प्रदर्शन

  खरसुंडी, ता. आटपाडी येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खरसुंडी जिल्हा परिषद गटाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री. चंद्रकांतभाऊ भोसले तसेच खरसुंडी पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार सौ. लताताई अर्जुन पुजारी सावकार यांच्या प्रचारार्थ ग्रामस्थांशी थेट संवाद साधण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह बापूसाहेब देशमुख, सरपंच धोंडीराम इंगवले, माजी सरपंच अर्जुन पुजारी, राहुल गुरव, सुभाष चोपडे, भाऊसाहेब गायकवाड, धनंजय पुजारी, नंदकुमार झंजे, विजय पुजारी, किरण पुजारी, बादशाह इनामदार, अतुल मोहिते, किरण सावकार, विक्रम भिसे, रणधीर गुरव यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक नेते, कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच खरसुंडी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पश्चिम भागातील तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी जयदीप भोसले यांना झेडपीत पाठवा-- आमदार सुहास बाबर

आटपाडी ता.4-आटपाडी पश्चिम भागातील खरसुंडीचे श्री. सिद्धनाथ, घोडेखूर,जकाईदरा, भिमाशंकर आणि शुकाचार्य या पवित्र देवस्थानच्या भरीव विकासासाठी जयदीप भोसले यांना जिल्हा परिषदेत पाठवा, असे आवाहन आमदार सुहास बाबर यांनी केले. खरसुंडी गटाचे शिवसेनेचे उमेदवार जयदीप भोसले पंचायत समितीच्या उमेदवार डॉ. मिनाक्षी पुजारी, सुनिता सरगर यांच्या प्रचारार्थ तळेवाडी, काळेवाडी, गोमेवाडी, हिवतड, मानेवाडी, अर्जुनवाडी आदी गावांचा आमदार सुहास बाबर यांनी दौरा करून प्रचार सभा घेतल्या. त्यांच्या सोबत जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, तीर्थक्षेत्र आघाडीचे भारत पाटील, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, हरीभाऊ माने आदी सोबत होते. यावेळी आमदार श्री. बाबर यांनी खरसुंडीचे श्री. सिद्धनाथ देवस्थानला चारही बाजूने जोडणाऱ्या रस्त्यासाठी 177 कोटी रुपये देऊन कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. खानापूर मतदार संघात सर्वाधिक नेलकरंजी परिसराला मोठी धार्मिक स्थळाचे भाग्य लाभले आहे. त्याचा कायापालट केला जाईल. शेतीसाठी पाणी आले आहे आता विजेची गरज आहे. 50% भागात दिवसा वीज देण्याचा प्रयोग सुरू केला आहे. उर्व...

महिला आणि तरुणांचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी अँड. मोटेनाचा संधी द्या- आमदार सुहास बाबर

आटपाडी ता. 4- महिला आणि तरूणांचे  उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी विद्या मोटे यांनाच जिल्हा परिषदेला संधी द्या, अशी साद आमदार सुहास बाबर यांनी घातली.              निबवंडे जिल्हा परिषद गटाची निवडणुक प्रचार सभेचे घरनिकी आणि बनपुरी येथे आयोजन केले होते. यावेळी आमदार श्री. बाबर बोलत होते. यावेळी उमेदवार अँड. विद्या मोटे, तानाजीराव पाटील, अनिल पाटील, अहिल्या पुकळे प्रमुख उपस्थित होते. आमदार श्री. बाबर यांनी गावात, तालुक्यात आणि मतदार संघात केलेल्या कामांचा आढावा मांडला. ते म्हणाले,'पन्नास टक्के खानापूर मतदार संघात शेतीसाठी दिवसा वीज दिली आहे.काही दिवसातच भाडेतत्त्वावर जमिनी घेऊन सौरऊर्जा प्रकल्प उभारून शेतीला दिवसा वीज देण्यासाठी प्रयत्नशील आहे. सांगली जिल्हात सर्वात जास्त चांगली जिल्हा परिषदेच्या शाळा आणि आरोग्य सुविधाची गुणवत्ता सुधारून रस्त्यांची कामे केली आहेत. आम्ही केलेली आणि करणारी कामे सांगून मतदान मागतो. तर विरोधकांकडे सांगण्यासारखे कामच नाही. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून बाहेरून पोरं आणून गाड्यांची तोडफोड सुरू केली आहे...

धनगर तरुण समाजाचा बनतोय "कोहिनूर"

आटपाडी -मेंढपाळी आणि शेतीच्या कष्टाळू वारशातून पुढे येत, सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील धनगर समाजाने आता प्रगतीचे नवे शिखर गाठले आहे. एकेकाळी अशिक्षितपणा आणि अंधश्रद्धेच्या सावटाखाली असलेल्या या समाजातील तरुण पिढी आज उच्च शिक्षण, भव्य उद्योग साम्राज्य आणि सामाजिक भान जपत तालुक्याचा 'कोहिनूर हिरा' ठरू लागली आहे. *पारंपरिक व्यवसायाकडून आधुनिकतेकडे* आटपाडी तालुक्यात धनगर समाजाची लोकसंख्या मोठी आहे. पिढ्यानपिढ्या मेंढपाळी आणि शेती हाच या समाजाचा मुख्य आधार राहिला आहे. मात्र, बदलत्या काळानुसार समाजातील तरुण वर्गाने शिक्षणाचे महत्त्व ओळखले आहे. केवळ पदव्या न घेता, हा तरुण वर्ग आता सामाजिकदृष्ट्या जागरूक झाला असून प्रशासकीय सेवा, अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यावसायिक क्षेत्रांत स्वतःचा ठसा उमटवत आहे.  उद्योजकतेचे नवे क्षितिज: तालुक्यातील अनेक तरुणांनी केवळ नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचे उद्योग सुरू केले आहेत. अनेक तरुणांनी मोठ्या शहरांत जाऊन शून्यातून विश्व उभे केले असून आज ते मोठ्या उद्योग साम्राज्याचे मालक आहेत. विशेषतः गलाई व्यवसायात आणि इतर व्यापारी क्षेत...

धनगर समाजाचे "कोहिनूर"

नेलकरंजी गणात विकासापुढे विरोधकाची तटबंदी ढासळल,ी सुनिता सरगर यांच्या परड्यात जनमताचे भरभरून दान

आटपाडी ता. 3- नेलंकरजी पंचायत समिती गणात शिवसेनेच्या उमेदवार सुनिता सरगर यांनी प्रचारात  आघाडी घेतली असून, त्यांचा झंझावात कायम आहे. तळेवाडी, गोमेवाडी, मानेवाडी आणि नेलकरंजी यांसारख्या गावांतून मिळालेला अभुतपुर्व प्रतिसादामुळे त्यांच्या विक्रमी मताधिक्यावर आता शिक्कामोर्तब झाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.  खरसुंडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयदीप भोसले आणि तळेवाडी गणाच्या उमेदवार सुनिता सरगर यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे आमदार सुहास बाबर, तानाजीराव पाटील, भारत पाटील आणि अनिल पाटील यांनी गावोगावी झंझावाती सभा घेतल्या आहेत.             *गावकरी शिवसेनेच्या पाठीशी* गेल्या चार दिवसांपासून तळेवाडी गणातील प्रत्येक गावात सुनिता सरगर यांच्याबद्दल सहानुभूती आणि पाठिंबा वाढत चालला आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेने गेल्या काही काळात केलेल्या विकासकामांना पाहुन विरोधकांच्या हक्काच्या मतदारांनीही आता शिवसेनेचा रस्ता धरला आहे. प्रचारादरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केल्याने युतीची ताकद द्विगुणित झाली आहे.शिवसेनेच्या वाढत्या प...