आटपाडी ता. 11- करगणी ग्रामपंचायती थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत निसटता पराभवाच्या राखेतून सावरून दत्तात्रय पाटील यांनी पंचायत समितीच्या निवडणुकीत तब्बल २८९५ मतांच्या फरकाने ऐतिहासिक विजय मिळवत फिनिक्स भरारी घेतली. तर करगणीला ज्येष्ठ नेते कै. अण्णासाहेब पत्की, कै. विजयसिंह पाटील आणि कै. सर्जेराव खिलारी यांच्या पश्चात चांगले सर्वसमावेशक नेतृत्व मिळाले.
ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने विरोधकांनी दत्तात्रय पाटील यांच्या राजकीय कारकीर्दवर शंका उपस्थित केली होती. मात्र, 'राजकारणात पराभव हा शेवट नसतो' हे पाटील यांनी सिद्ध केले. या विजयामुळे त्यांचे राजकीय वजन केवळ करगणी गणातच नव्हे तर संपूर्ण आटपाडी तालुक्यात वाढले आहे.
भाजपचे तगडे उमेदवार संभाजी पाटील यांना केवळ ४२८२ मतांवर समाधान मानावे लागले. तर दत्तात्रय पाटील यांना मिळालेला ७१७७ मतांचा कौल दिला. ् या निवडणुकीतील सर्वाधिक मतांपैकी एक विजय मानला जात आहे.
राजकीय समीकरणांमध्ये बदल
दत्तात्रय पाटील यांचा हा विजय केवळ एक जागा जिंकण्यापुरता मर्यादित नसून, तो आगामी काळातील तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारा ठरणार आहे. आमदार सुहास बाबर आणि जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.
हा निकाल अनेक तरुण कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे, तर प्रस्थापित नेत्यांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. पंचायत समितीवर भगवा फडकवत असतानाच, दत्तात्रय पाटील यांच्या रूपाने जमिनीवर काम करणारे नेतृत्व मिळाले आहे.
एकूणच, या निकालाने आटपाडीच्या राजकारणात दत्तात्रय पाटील यांचे नाव आता ठळकपणे कोरले गेले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा