आटपाडी ता. 3- नेलंकरजी पंचायत समिती गणात शिवसेनेच्या उमेदवार सुनिता सरगर यांनी प्रचारात आघाडी घेतली असून, त्यांचा झंझावात कायम आहे. तळेवाडी, गोमेवाडी, मानेवाडी आणि नेलकरंजी यांसारख्या गावांतून मिळालेला अभुतपुर्व प्रतिसादामुळे त्यांच्या विक्रमी मताधिक्यावर आता शिक्कामोर्तब झाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
खरसुंडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयदीप भोसले आणि तळेवाडी गणाच्या उमेदवार सुनिता सरगर यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे आमदार सुहास बाबर, तानाजीराव पाटील, भारत पाटील आणि अनिल पाटील यांनी गावोगावी झंझावाती सभा घेतल्या आहेत. *गावकरी शिवसेनेच्या पाठीशी*
गेल्या चार दिवसांपासून तळेवाडी गणातील प्रत्येक गावात सुनिता सरगर यांच्याबद्दल सहानुभूती आणि पाठिंबा वाढत चालला आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेने गेल्या काही काळात केलेल्या विकासकामांना पाहुन विरोधकांच्या हक्काच्या मतदारांनीही आता शिवसेनेचा रस्ता धरला आहे. प्रचारादरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केल्याने युतीची ताकद द्विगुणित झाली आहे.शिवसेनेच्या वाढत्या प्रभावामुळे विरोधकांची प्रचार यंत्रणा कमालीची ढिल्ली पडली असल्याचे चित्र आहे. कार्यकर्त्यांची धरसोड आणि मतदारांचा थंड प्रतिसाद यामुळे विरोधी गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. तळेवाडी, गोमेवाडी आणि नेलकरंजी या पट्ट्यात सुनिता सरगर यांना मिळणारे समर्थन पाहता, जयदीप भोसले आणि सरगर यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे बोलले जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा