गेल्यावर्षीच्या तुलनेमध्ये यंदा देशात साधारणतः दहा ते पंधरा टक्क्यांनी कापसाच्या क्षेत्रामध्ये वाढ होण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. कापसाच्या क्षेत्रात वाढ होण्याची अनेक अनेक कारणे आहेत. बोगस बियाणे, पाणीटंचाई, मार्गदर्शिकांचा अभाव, खर्चाच्या तुलनेत कमी दर अशा विविध कारणामुळे राज्यात काही ठिकाणी कापसाचे क्षेत्र कमी झालेले होते. मात्र यंदा यामध्ये मोठा बदल झाला असून सरासरीपेक्षा दहा ते पंधरा ते वीस टक्के पर्यंत जास्त कापसाचे लागवड झाली आहे. त्यामुळे कापसाचे उत्पादन 15 ते 20 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वेगवेगळ्या राज्यांमध्ये कापसाचे क्षेत्र वेगवेगळ्या प्रमाणात आहे. पंजाब मध्ये गेल्या दोन वर्षांपासून कापसाचे क्षेत्र प्रचंड कमी झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे रब्बी हंगामात नुकसान झाले. त्याचबरोबर काही अनेक कारणे आहेत की जी कापसाच्या लागवडीवर परिणाम करू शकतात.अनेक तज्ञांच्या मते वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज वर्तवण्यात येत आहे, कापसाचे क्षेत्र दहा टक्के वाढेल, तर काही तज्ञ असे सांगत आहे की कापसाच्या लागवडीमध्ये घट होईल. त्याचबरोबर कॉटन असोसिएशन यांच्यामध्ये वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार रब्बी पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लागवड होऊ शकते. अवकाळी पावसाचे सावट पिकांवर होते, व अशाच शेतकरी कापसाची लवकर लागवड करू शकतात व त्यामुळे त्याच्या क्षेत्रामध्ये वाढ होऊ शकते असा अंदाज कॉटन असोसिएशन अंतर्गत वर्तवलेला आहे. कापसाचे क्षेत्र तब्बल 10 टक्क्यांनी वाढेल?
कापसाला आत्ता पर्यंतचा सर्वात कमी दर मिळात होता. त्यामुळे लागवडीखालील क्षेत्र घटत चालले होते.
परंतु गेल्या वर्षी बोंड अळीचा प्रादुर्भाव होता, त्यामुळे साधारणतः शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. शेतकऱ्यांची उत्पादने घडलेली होती. अशाच एक एक येणाऱ्या आपत्तीमुळे कापसाच्या शेतामध्ये घट होत आली आहे. शेतकरी इतर पिकांकडे वळत आहेत. परंतु कापूस लागवड क्षेत्राबाबत आशादायक चित्र असून लागवडीच्या क्षेत्रात चांगली वाढ होत चालली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा