मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

दोनशे टन उत्पादन, उसापेक्षा जास्त उत्पादन देणारे 'हे'पीक घेण्याचा नितीन गडकरींनी शेतकऱ्यांना दिला सल्ला

पैठण: बांबू ईकोनॉमी गरजेची असून देशात रस्त्याच्या बाजूला बांबू लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी बांबूचे उत्पादन घ्यावे, एका एकरात २०० टन बांबू होतो. बांबू सर्वात जास्त कार्बनडाय ऑक्साईड सोसून घेतो. वीज निर्मितीसाठी कोळशाऐवजी बांबूचा वापर करता येतो. यामुळे स्वस्तात वीजनिर्मिती होईल, देशाचे १६ लाख कोटी रुपये वाचून ते शेतकऱ्यांना मिळाले तर शेतकरी अन्नदाता व ऊर्जादाता बनेल. यामुळे शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी येथे एका कार्यक्रमात केले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व अभिनेता सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई या संस्थेच्या वतीने पैठण-छत्रपती संभाजीनगर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी तोडलेल्या ५१ वटवृक्षाचे पुनर्रोपण पैठण येथे यशस्वी करण्यात आले आहे. या पुनर्रोपित वटवृक्षाची पाहणी रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री संदीपान भुमरे, अभिनेता सयाजी शिंदे, भाजपाच्या प्रदेश महिला उपाध्यक्ष रेखाताई कुलकर्णी, माजी ...

शिपुर मध्ये विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी केले जंगी स्वागत

शिपुर- येथील आर. सी. पटेल माध्य व उच्च माध्य विद्यालय खरदे  येथे ५वीत नवीन प्रवेश घेतलेल्या विदयार्थ्यांचे स्वागत व क्रमित पुस्तक वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  गावातील सरपंच सौ. सविताबेन पटेल तर प्रमुख पाहुणे म्हणून मार्केट कमिटीचे मा. संचालक राजकपुर मराठे व ग्रा. प. सदस्य नामदेव पाटील, प्राथ. शाळेच्या मुखयाध्यापिका सौ क्रांती जाधव, प्राचार्य पी.व्ही. पाटील उपस्थित होते. सुरुवातील स्व.खासदार मुकेशभाई पटेल यांना आदरांजली वाहण्यात आली. नंतर पाचवीतील  विद्यार्थ्यांचे औक्षण करून  गुलाबपुष्य देऊन व पेढे भरवून स्वागत करण्यात आले.नंतर इयत्ता पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तकाचे वाटप करण्यात आले. विद्यालयाच प्राचार्य पी व्ही पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतांना शालेय उपक्रम, नियमित अभ्यास शिस्त यातून आपले जीवन घडवावे. आपल्या अडचणी, शंका शिक्षकांना विचाराव्यात असे सांगितले. गावात रॅली काढून शिक्षणासंदर्भात जनजागृती करण्यात आली. बोलकी घोषवाक्य, बॅण्ड पथक यांनी ग्रामस्थांचे लक्ष वेधुन घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचाल...

युवकांनी कलागुणातून व्यक्त व्हावे आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे या.१५-  नेहरू युवा केंद्र पुणे व डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हास्तरीय युवा उत्सव २०२३ कार्यक्रम डेक्कन कॉलेजच्या आवारात उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार श्री सिद्धार्थ शिरोळे ,डेक्कन अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद पांडेय,नेहरू युवा केंद्राचे उपसंचालक श्री यशवंत मानखेडकर ,राष्ट्रीय सेवा योजना चे क्षेत्रीय संचालक डी.कार्थिकेयन ,डेक्कन अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.प्रसाद जोशी ,डेक्कन अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव प्रा.अभिजीत दांडेकर ,पुणे मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन उपयुक्त आशा राऊत,पुणे मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ.केतकी घाटगे ,कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष श्रो चंद्रकांत शहासने इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वालालने झाली.                             प्रास्ताविकपर भाषणात बोलताना नेहरू युवा केंद्राचे उपसंचालक श्री यशवंत मानखेडकर म्हणाले ,"देशाच्या अम...

विटा पोलीसांनी 17 तलवारी जप्त केल्या

विटा- येथे तलवार विक्री करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 17 हजार रुपयांच्या तब्बल 17 लोखंडी तलवारी जप्त केल्या आल्या आहेत. भगतसिंह शीख असं या तरुणाचं नाव आहे. तासगाव-आळसंद रोडवर विटा पोलिसांनी सापळा रचून तलवार विक्री करत असताना त्याला पकडलं आहे. सदर तरुण सांगली शहरात राहत असल्याचं समोर आलं असून त्याच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भगतसिंह शिखला न्यायालयासमोर हजर केलं असता 14 जूनपर्यंत त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. पण नेमकं इतक्या संख्येनं तलवारी कशासाठी खरेदी केल्या जात होत्या आणि कुठे नेल्या जात होत्या? याचा तपास केला जात आहे. तासगाव ते आळसंद बायपास रोडवर एक व्यक्ती तलवार विक्री करण्यासाठी फिरत असल्याची माहिती विटा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला असता काही वेळानंतर एक व्यक्ती मोटारसायकलवरुन येत असल्याचं आढळून आलं. तिच्यावर संशय आल्यानं संबंधित व्यक्तीचा पाठलाग करुन तिला थांबवून पोलिसांनी झडती घेतली.  दरम्यान, त्याच्याजवळील एका प्लास्टिकच्या पोत्यामध्ये 17 ...

कृष्णा नदीवर उपसा बंदी

सांगली--कोयना धरणातून कमी करण्यात आलेला विसर्ग तसेच कृष्णा नदीने गाठलेल्या तळामुळे कोल्हापूरनंतर आता सांगली जिल्ह्यातही उपसाबंदी लागू करण्यात आली आहे. कृष्णा नदीतून शेतीसाठी खासगी उपसा करणाऱ्या सर्व योजनांवर उपसाबंदी आदेश जारी करण्यात आला आहे. केवळ पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करणाऱ्या योजना सुरु राहणार आहेत. उद्यापासून (14 जून) उपसाबंदी आदेश लागू होणार असून तो 17 जूनपर्यंत असेल. त्यानंतर 18 ते 20 जून या कालावधीत उपसा करता येणार आहे. तसेच पर्जन्यमानानुसार व परिस्थितीनुसार पुढील नियोजन करण्यात येणार आहे. वरील नमूद केलेल्या कालावधीमध्ये पिण्याचा पाणीपुरवठा सोडून इतर कारणांसाठी कृष्णा नदीतून उपसा केल्यास संबंधितांचा पाणी परवाना व विद्युत पुरवठा एक वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येणार आहे. तसेच सामग्री जप्त करून पुढील कारवाई करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असेही पाटबंधारे विभागाच्या आदेशात म्हटले आहे. ताकारी योजना आजपासून बंद करण्यात आली आहे, तर केवळ टेंभू आणि म्हैशाळ अंशतः सुरू आहेत.  दरम्यान, चांदोली धरण व अभयारण्य प्रवेश पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. चांदोली अभयार...

आटपाडीच्या माळावर कापूस डोलू लागला

आटपाडी - पांढऱ्या सोन्यासाठी कधीकाळी प्रसिद्ध असलेल्या आटपाडी तालुक्यात यंदा एकतपा नंतर दीड ते दोन हजार एकर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. त्यामुळे यंदापासून आटपाडीच्या बाजारपेठेला कापसाचे गतवैभव मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.                                    सांगली जिल्हात एकमेव आटपाडी तालुक्यात अत्यंत चांगल्या आणि लांब धाग्याचा कापूस पिकत होता. दर्जेदार कापूस उत्पादनासाठी आटपाडीचा नावलौकिक होता. तालुक्यात १९९० पासून लागवडीची सुरूवात झाली होती. शेतकरयांना हमखास पैसे देणारे पिक असल्यामुळे अल्पावधीत लागवडीचे क्षेत्र वाढले. आटपाडीच्या बाजारपेठा कापसाने गजबजल्या होत्या. बेळगांव,आथणी, विजापूर या भागातून कापूस खरेदीसाठी व्यापारी तळ ठोकूनच असायचे. रोज पाच पंचवीस ट्रक भरून कापूस पर राज्यात जात होता. आटपाडी, करगणी, खरसुंडी, दिघंची आणि झरे गावचे आठवडा बाजार कापसाच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध झाले होते. साधारण तीन महिने कापसाचा हंगाम चालू राहायचा. तिथे मोठी आर्थिक उलाढाल होत होती. 2010 ते 12...

पंजाब डंक यांनी जाहीर केला नवीन हवामानाचा अंदा,ज तुमच्या भागात यावेळी पडणार पाऊस

सांगली--पंजाब डख हे आपल्या हवामान अंदाजासाठी शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. शेतकरी सांगतात की, डख यांचा हवामान अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरतो. यंदा मात्र डख यांच्या मान्सून आगमना बाबतचा अंदाज फोल ठरला होता. विशेष बाब म्हणजे यंदा भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाला देखील मान्सूनने चकवा दिला आहे. मात्र आता राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. काल अर्थातच 11 जून 2023 रोजी मान्सूनचे दक्षिण कोकणात अर्थातच तळ कोकणात आगमन झाले आहे. शिवाय पुढील 48 तासात मान्सून संपूर्ण महाराष्ट्रभर पसरणार असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान आज आपण पंजाब डख यांनी दरवर्षी कोणत्या तारखांना महाराष्ट्रात हमखास पाऊस पडतो यासंदर्भात दिलेल्या माहिती विषयी जाणून घेणार आहोत. कोणत्या तारखांना पडतो पाऊस? पंजाब डख सांगतात की, दरवर्षी शेतकऱ्यांची जून अखेरपर्यंत म्हणजे 27 ते 28 जून पर्यंत पेरणी होत असते. म्हणजेच दरवर्षी 27 ते 28 जून पूर्वी राज्यात जवळपास सर्वत्र पाऊस पडून जातो. जर समजा राज्यात जून अखेरपर्यंत पाऊस झाला नाही तर 10 जुलैपासून ते 15 जुलै पर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यात, सर्व गावात पाऊस हजेर...