मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ज्येष्ठांना पेन्शन देताय की जाताय,,,,,,,, यांनी दिला इशारा

आटपाडी ता.१- केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना सन्माननिधी देऊन अल्प प्रमाणात सन्मान केला आहे मात्र यात साठ वर्षांवरील ज्येष्ठांचा कुठेच विचार केला नाही. देशात आणि राज्यात ज्येष्ठांची 25% वर लोकसंख्या आहे. जर का पेन्शन देणार नसाल तर सत्ताधार्‍यांना घरात बसवू असा खणखणीत इशारा देऊन राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांसह साठ वर्षांवरील ज्येष्ठांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन द्यावी, यासाठी जनता दलाने मंगळवार ता. ११ रोजी तहसील कार्यालयावर आयोजित केलेल्या मोर्चात शेतकरी आणि ज्येष्ठानी सहभागी होण्याचे आवाहन जनता दलाचे तालुका अध्यक्ष आबासो सागर यांनी केले आहे.                                                        माजी आमदार शरद पाटील, माजी आमदार रामहरी रुपनवर आणि माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाला जत, आटपाडी, खानापूर, माण, खटाव आणि सांगोला तालुक्यात गाव गावी बैठका घेऊन प्रबोधन सुरू केले आहे. या भागातून मोठ्...

राष्ट्रवादी काँग्रेसने माणगंगा साखर कारखाना विकासाचे केंद्र बनवावे

आटपाडी ता.१- येथील बंद माणगंगा साखर कारखाना सुरू करून राष्ट्रवादी काँग्रेसने आटपाडीसह सांगली, सातारा आणि सोलापूर तीन जिल्ह्याचे विकास मुख्य केंद्र बनवावे, अशी मागणी " एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी " या उपक्रमाच्या माध्यमातून घेतलेल्या बैठकीत केला.                  राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव सादिक खाटीक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीचे स्वागत असिफ खाटीक यांनी केले. यावेळी मनोज भोसले, विनोद बनसोडे, असिफ कलाल,अतुल गायकवाड, प्रकाश पाटील, आप्पासाहेब ऐवळे, अमिर तांबोळी, प्रशांत पोरे, असिफ कुरेशी, अमित खंडागळे, इम्रान शेख आदी उपस्थित होते.  बैठकीत माणगंगा साखर कारखाना बंद पडल्यामुळे झालेल्या प्रतिकूल परिणाम वर चर्चा झाली. तो कारखाना पुन्हा सुरू करावा, अशी साऱ्यांनीच अपेक्षा व्यक्त केली. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षाही व्यक्त केली. तसेच खानापूर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचाच आमदार निवडून यावा, यासाठी वाडी-वस्ती ...

श्री. संत बाळूमामा देवस्थान समितीच्या बरखास्तीची आमदार गोपीचंद पडळकराची मागणी

आटपाडी ता.३०- आदमापूर ( जि. कोल्हापूर) येथील महाराष्टाचे जागृत देवस्थान संत बाळूमामांच्या लौकीकाला व्यवस्थापन समितीच भ्रष्ट आचरणातून धक्का लावण्याचं काम करत आहे. भ्रष्टाचारात बरबटलेली ही समिती विसर्जीत करून शासनानेच धर्मादाय कायदा आणून धनगर समाजाचे प्रतिनिधित्व असलेली नविन समिती निर्माण करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे केली असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.                                                                 आदमापुर जिल्हा्ह्हा््हा्ह्हा्हा्ह्््ह्हा््हा्ह्हा््हा्ह्हा् कोल्हापूर येथील श्री संत बाळूमामा हे महाराष्ट्रात जागृत देवस्थान म्हणून श्रद्धास्थान म्हणून मानले जाते. त्याच्या दर्शनासाठी राज्य देश आणि परदेशातून कोट्यावधी भाविक दरवर्षी येतात तेथे मोठे धार्मिक सोहळे पार पडतात. तेथील व्यवस्थापन समितीच्या भ्रष्ट कारभाराची तक्रार आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा लौकिक जगात पोहोचवला- आमदार गोपीचंद पडळकर

  आटपाडी ता.३०- केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नेतृत्वाखाली भाजप सरकारने नऊ वर्षात सर्व सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून शेतकरी सन्मान या महत्वकांक्षी योजनेपासून जागतिक स्तरावर देशाची मान उंचावेल अशा अनेक योजना राबविल्या असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.                                पंतप्रधान नरेंद्र मोदी @ 9  अभियानांतर्गत येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी आमदार पडळकर यांनी नऊ वर्षात केंद्र सरकारने राबवलेल्या योजनेवर प्रकाश टाकला. तसेच विरोधकांचाही खरपूस समाचार घेतला. यावेळी भाजपच्या ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष विलास काळेबाग, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, अनिल पाटील, जयवंत सरकार, आणि भाजपचे तालुकाध्यक्ष  उमाजी सरगर प्रमुख उपस्थित होते. ते म्हणाले,"सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना सन्माननिधी देऊन खऱ्या अर्थाने देश स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदाच शेतकऱ्यांचा सन्मान करून दाखव...

'मटण खाऊन केसीआर पंढरपूरात', आ.आमोल मेटकरीची सडकून टीका

      मुंबई-तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव महाराष्ट्रात येऊन शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते त्यांच्या बीआरएस पक्षाचं महाराष्ट्रात विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत. याचअनुशंगाने त्याचा सोलापूर दौरा होत आहे. यासाठी ते हैद्राबादवरून निघाले असून त्यांच्याबरोबर 400 ते 600 वाहणांचा ताफा आहे. तर यावेळी त्यांचे अख्खे मंत्रीमंडळच सोबत आहे. ते पंढरपूर येथे जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत. यावरून सध्या चर्चा होताना दिसत आहे. तर टीका ही. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी केसीआर यांच्या मेजवाणीचा फोटो ट्विट करत टीका केली आहे. त्यांनी मटनाचा शाही बेत! पंढरी वारिवर असताना मुख्यमंत्री केसीआर हा प्रकार शोभतो का? वारकऱ्यांच्या भावनाशी खेळू नका? पंढरपूर येताना 10 हजार वेळा विचार करा असा सल्ला दिला आहे. तर पंढरीची वारी पवित्र आहे आपल्या अश्या वागण्याने अपवित्र करू नका असं म्हटलं आहे. त्याचबोरबर महाराष्ट्रात तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे आगमन होण्यापुर्वी पैशाच्या जोरावर ठिकठिकाणी मटणाचे बेत आखले जात आहेत. बॅनरवर पांडुरंगाचे फोटो तर ...

माजी मुख्यमंत्र्याच्या मुलीने घेतला लिंग बदलण्याचा निर्णय

दिल्ली : अमेरिका आणि युरोप सारख्या देशात लिंग बदलने अगदी सामान्य झालं आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्वच क्षेत्रात प्रगती झाली आहे. IVF ने अनेक बदल घडवून आणले आहेत. भारतातही आता लिंग बदलून घेण्याचं प्रमाण वाढलं आहे. अशातच पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांची मुलगी सुचेतना भट्टाचार्य यांनी आपले लिंग बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सुचेतनाला ऑपरेशनद्वारे लिंग बदलून ‘सुचेतन’ बनायचे आहे. यासाठी त्यांनी कायदेशीर सल्लाही घेतला आहे. सुचेतना भट्टाचार्य यांनी काही दिवसांआधी LGBTQ वर्कशॉप मध्ये भाग घेतला होता. LGBTQ च्या हक्कांसाठी लिंग बदलण्याचे त्यांनी सांगितलं आहे. समाजातील ट्रांज जेंडर असणाऱ्या व्यक्तींच्या होणाऱ्या छळाला त्यांना थांबवायचं आहे म्हणूनत त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सुचेतनाला विश्वास आहे, तिच्या या निर्णयात तिचे घरचे साथ देतील, कारण सुचेतनाच्या वडिलांना, बुद्धदेव भट्टाचार्य यांना याबद्दल लहानपणापासूनच माहित आहे. लोक लिंग का बदलतात? जर एखाद्या पुरूषाचं शरीर हे पुरुषाचं असेल आणि मन स्त्रिच असेल याच्याच उलट एखादी स्त्री शरीराने स्त्री असते मात्र तिचं मन मात्र ...

*राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळाचे स्मारक करणे हा राज्य सरकारचा संकल्प - चंद्रकांत पाटील*

कोल्हापूर : आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती‌ निमित्त राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळी जाऊन महाराजांना अभिवादन केले. त्यानंतर कोल्हापुरातील नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्मारक सुशोभिकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांचे भूमिपूजन कार्यक्रमास त्यांनी उपस्थिती लावली.  यावेळी राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळाचे स्मारक करणे हा राज्य सरकारचा संकल्प असल्याचे सांगितले. तब्बल  ९ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे नुतनीकरण, तसेच राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनावरील कलादालन, परिसरातील लॅंडस्केपिंग, संरक्षक भिंत, पादचारी मार्ग, वाहनतळ, समाधीवास्तूंची दुरूस्ती, विद्युतीकरण आदी कामे केली जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.  यावेळी या वेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खा. धनंजय महाडिक, आ. प्रकाश आवाडे, आ. सतेज पाटील, आ. ऋतुराज पाटील, आ. जयश्री जाधव, आम. जयंत आसगावकर, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, भाजप जिल्हाध्यक्ष राहुल ...