मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

टेंभूच्या पाण्याची मागणी नोंदवण्याचे अहवान

आटपाडी ता. 29- टेंभू योजनेचे खरीप आवर्तन सुरू झाले असून ज्या भागात शेतकऱ्यांना पाणी हवे आहे त्यांनी रितसर लेखी पाणी मागण्याची नोंदणी करावी, असे आवाहन टेभूचे उपविभागीय अधिकारी एस.बी.गियकवाड यांनी केले आहे.                     यंदा कोयनेतील पाणीसाठा लवकर कमी झाल्यामुळे उन्हाळी आवर्तन लवकर बंद केले होते. त्यामुळे अनेक भागातील तलाव आणि ओढ्यावरील बंधारे मागणी करूनही टेंभूच्या पाण्याने भरता आले नव्हते. त्यामुळे पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. गेल्या चार दिवसापासून टेंभू योजनेचे पंप सुरू केले आहेत. योजनेचे खरीप आवर्तन सुरू केले आहे. टेंभू योजनेतून खानापूर, आटपाडी, सांगोला, कवठेमंकाळ, तासगाव या तालुक्यात पाणी जाते. ज्या भागात तलावात आणि बंधाऱ्यात पाण्याची मागणी होईल त्या मागणीच्या क्रमाने सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या कार्यालयात पाण्याची लेखी मागणी करावी, असे आवाहन टेंभू विभागाने केले आहे. ज्या भागातून लवकर मागणी होईल त्या क्रमाने पाणी सोडले जाणार आहे.

पारेकरवाडी ग्रामपंचायत मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेत चार हजार टाकणार

आटपाडी ता.29- पारेकरवाडी ता. आटपाडी ग्रामपंचायतीने गावातील वर्षभरात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलींच्या नावाने प्रत्येकी चार हजार रुपये "सुकन्या समृद्धी योजनेत" टाकण्याचा  ऐतिहासिक निर्णय मासिक बैठकीत घेतला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुवर्णा कोकरे होत्या. ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाचे उपक्रमाचे तालुक्यातून कौतुक केले जात आहे.                                          ग्रामीण भागात मुलीच्या जन्मानंतर अजूनही काही पालकात नाराजी पसरते. मुलगी ही पालकांना ओझं वाटते. मुलीचे शिक्षण आणि विवाहाचा खर्च याच सर्वात मोठा कोडे पालकाच्या समोर असतात. त्यामुळेच पारेकरवाडी ग्रामपंचायतीने मुलीच्या विवाहाचे ओझे पालकावरचे कमी व्हावे आणि मुलीच्या जन्माचे स्वागत करावे या हेतूने वर्षभरात गावात नवीन जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावाने "सुकन्या समृद्धी योजनेत" चार हजार रुपये टाकण्याचा ऐतिहासिक निर्णय ग्रामपंचायतच्या मासिक बैठकीत सर्व सदस्यांनी घेतला आहे सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच ...

प्रा. नारायण खरजे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या रोजगार व स्वयंरोजगार समन्वयक पदी निवड

आटपाडी ता.२८- आटपाडीचे सुपुत्र प्रा. नारायण खरजे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश रोजगार व स्वयंरोजगार समन्वयक पदी निवड जाहीर केली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र दिले.                                   मुंबई येथील राष्ट्रवादी भवन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या काही नूतन निवडी जाहीर केल्या.  यामध्ये प्रा. नारायण खरजे यांची निवड जाहीर केली. त्यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रा. खरजे यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक सरचिटणीस राजू जानकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव म्हणून संघटनेत प्रा. खरजे दोन वर्षे काम करत होते. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची संघटनेच्या वरिष्ठ पदावर निवड केली आहे. प्रा. खरजे यांच्या निवडीबद्दल पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.            ...

श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्यपदाचा डॉ. शिवाजीराव भोसले यांनी पदभार स्वीकारला

आटपाडी ता.२५- येथील दि. आटपाडी शिक्षण संस्थेच्या श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाचा नुतन प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले यांनी प्राचार्यपदाचा कार्यभार स्वीकारला. रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय ते अर्थशास्त्र विभागाचे प्रोफेसर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निवडीबद्दल  महाविद्यालयाने स्वाग सोहळ्याचे आयोजन केले होते.  प्रभारी प्राचार्य डाॅ.विजय लोंढे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला. गेली सात वर्षे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणून डाॅ.विजय लोंढे यांनी कार्यभार सांभाळला होता. याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी स्वागत आणि प्रास्ताविक डाॅ.शिवाजीराव विभुते यांनी केले.  यावेळी प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले  बोलताना म्हणाले की, आटपाडी शिक्षण संस्थेचे आणि माझे ऋणानुबंध मैत्रीपूर्ण स्वरूपाचे असून मी याच संस्थेचा व महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याचा मला अभिमान आहे. रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात गेली छत्तीस वर्षे प्रामाणिकपणे सेवा केली. श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाचा शिवाजी विद्यापीठात ना...

लेंगरेवाडीतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दोस्ती इंग्लिशची उपक्रम

आटपाडी ता.२५- लेंगरेवाडी ता. आटपाडी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये  "दोस्ती इंग्लिशी" हा सकाळ माध्यम समूहाचा शालेय विद्यार्थ्यांच्यासाठी असलेला उपक्रम प्रभावीपणे राबवला जातोय. यामुळे लेंगरेवाडीतल्या पोरांचे इंग्रजी विषय असलेली भीती कमी होत चालली आहे.     लेंगरेवाडी ता. आटपाडी येथे  आटपाडी शिक्षण संस्थेचे 'न्यू. इंग्लिश स्कूल' माध्यमिक विद्यालय सुरू आहे. लेंगरेवाडीतील अनेक जण मेंढपाळ आणि ऊस तोडीसाठी स्थलांतर करत असतात. त्यांची मुलं या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनात इंग्रजी विषय भीती असते. या विद्यार्थ्यांची भीती दूर करून इंग्रजी विषय चांगला व्हावा या दृष्टिकोनातून सकाळ माध्यम समूहाने दैनिक सकाळ पेपरमधून "दोस्ती इंग्लिशी"हा उपक्रम सुरू केला आहे. तोच उपक्रम  मुख्याध्यापक डी आर मोहिते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या शाळेमध्ये सुरू केला आहे. विद्यार्थ्यांच्या मनातून इंग्रजी विषय असलेली भीती काढून टाकण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. "रायटिंग, स्पिकिंग लर्निंग" या धरतीवर हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या...

विद्यार्थ्यांसाठी "त्यांनी" बनवला स्वखर्चातून रस्ता

आटपाडी ता.२१- मासाळवाडी ते माडगूळे हा जुना रस्ता चिलार झाडानी व्यापल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते उद्योजक विनायक मासाळ यांनी स्वखर्चातून रस्ता चिलार मुक्त करून वाहतुकीसाठी खुला करून दिला. त्यांच्या या सामाजिक कार्याचे गावकऱ्यांनी विशेष कौतुक केले.                  मासाळवाडी ते माडगूळे हायस्कूल पर्यंत जुना रस्ता तीन किलोमीटर अंतराचा होता. मासाळवाडीतील विद्यार्थी गदिमा हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी रोज या रस्त्यावरून ये-जा करतात. या रस्त्याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा चिलारझाडी उगवली होती. ही चिलारीची झाडे मोठी झाली होती. चिलार झाडीमुळे संपूर्ण रस्ताच व्यापला होता. या चिलारीतून वाट काढत शालेय विद्यार्थ्यांना रोजची ये-जा करावी लागत होती. गावातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक विनायक मासाळ यांची भेट घेऊन रस्त्याचा प्रश्न मांडला. विनायक मासाळ यांचा राजकीय नेते मंडळी जवळचा संपर्क आहे. त्या माध्यमातून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी गावक...

टेंभू योजना दोन दिवसात सुरू होणार- आमदार अनिल बाबर

आटपाडी -खानापूर व आटपाडी तालुक्यांतील दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता टेंभू उपसा सिंचन योजना दोन दिवसांत चालू करण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीत घेतल्याची माहिती आमदार अनिल बाबर यांनी दिली आहे.आमदार बाबर म्हणाले, सांगली जिल्ह्यातील खानापूर आणि आटपाडी तालुक्यांमध्ये समाधानकारक पर्जन्यवृष्टी न झाल्यामुळे या तालुक्यात सिंचनासाठी पाण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच सातारा जिल्ह्यातील माण, खटाव या तालुक्यातही पुरेसा पाऊस झालेला नाही. परिणामी शेती पिकांचे विशेषतः ऊस, द्राक्ष आणि डाळिंब पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे तातडीने टेंभू उपसा जलसिंचन योजना सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्याबाबत काल गुरुवारी, सायंकाळी २० जुलै कालवा सल्लागार समितीची बैठक मुंबई येथे पार पडली. यांत पुढच्या दोन दिवसात टेंभू योजनेचे पाणी सोडण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस आपल्यासह मंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, खासदार संजय पाटील, जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, दीपक चव्हाण, आमदार मकरंद पाटील, आमदार अरुण लाड, आमदार विश्वज...