आटपाडी ता. 29- टेंभू योजनेचे खरीप आवर्तन सुरू झाले असून ज्या भागात शेतकऱ्यांना पाणी हवे आहे त्यांनी रितसर लेखी पाणी मागण्याची नोंदणी करावी, असे आवाहन टेभूचे उपविभागीय अधिकारी एस.बी.गियकवाड यांनी केले आहे. यंदा कोयनेतील पाणीसाठा लवकर कमी झाल्यामुळे उन्हाळी आवर्तन लवकर बंद केले होते. त्यामुळे अनेक भागातील तलाव आणि ओढ्यावरील बंधारे मागणी करूनही टेंभूच्या पाण्याने भरता आले नव्हते. त्यामुळे पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. गेल्या चार दिवसापासून टेंभू योजनेचे पंप सुरू केले आहेत. योजनेचे खरीप आवर्तन सुरू केले आहे. टेंभू योजनेतून खानापूर, आटपाडी, सांगोला, कवठेमंकाळ, तासगाव या तालुक्यात पाणी जाते. ज्या भागात तलावात आणि बंधाऱ्यात पाण्याची मागणी होईल त्या मागणीच्या क्रमाने सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या कार्यालयात पाण्याची लेखी मागणी करावी, असे आवाहन टेंभू विभागाने केले आहे. ज्या भागातून लवकर मागणी होईल त्या क्रमाने पाणी सोडले जाणार आहे.
करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा