मुख्य सामग्रीवर वगळा

टेंभूच्या पाण्याची मागणी नोंदवण्याचे अहवान

आटपाडी ता. 29- टेंभू योजनेचे खरीप आवर्तन सुरू झाले असून ज्या भागात शेतकऱ्यांना पाणी हवे आहे त्यांनी रितसर लेखी पाणी मागण्याची नोंदणी करावी, असे आवाहन टेभूचे उपविभागीय अधिकारी एस.बी.गियकवाड यांनी केले आहे.                     यंदा कोयनेतील पाणीसाठा लवकर कमी झाल्यामुळे उन्हाळी आवर्तन लवकर बंद केले होते. त्यामुळे अनेक भागातील तलाव आणि ओढ्यावरील बंधारे मागणी करूनही टेंभूच्या पाण्याने भरता आले नव्हते. त्यामुळे पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. गेल्या चार दिवसापासून टेंभू योजनेचे पंप सुरू केले आहेत. योजनेचे खरीप आवर्तन सुरू केले आहे. टेंभू योजनेतून खानापूर, आटपाडी, सांगोला, कवठेमंकाळ, तासगाव या तालुक्यात पाणी जाते. ज्या भागात तलावात आणि बंधाऱ्यात पाण्याची मागणी होईल त्या मागणीच्या क्रमाने सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या कार्यालयात पाण्याची लेखी मागणी करावी, असे आवाहन टेंभू विभागाने केले आहे. ज्या भागातून लवकर मागणी होईल त्या क्रमाने पाणी सोडले जाणार आहे.

टिप्पण्या