मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

खरसुंडीत अजित पवार यांना शिवसेनेकडून श्रद्धांजली

आटपाडी ता.१- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल खरसुंडी येथे शिवसेनेने शोकसभेचे आयोजन केले होते. यावेळी अनेक मान्यवरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यपद्धतीला उजाळा देऊन श्रद्धांजली अर्पण केली.              खरसुंडी येथे शिवसेनेच्या कार्यालयात हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जयदीप भोसले यांच्या हस्ते अजित पवार यांच्या प्रतिमेस अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी डॉ. मनीषा पुजारी, डॉ. उमेश पुजारी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत देठे प्रमुख उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवर आणि केलेल्या कामावर प्रकाश टाकून मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. यावेळी विनोद पुजारी, जहांगीर शेख,दुर्वाआप्पा देठे, ओटीवाडी विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष बापुराव खाडे,मा जी उपसरपंच मच्छिंद्र भोसले, सुमंत पुजारी,शरद पेडकर, ग्रामपंचायत सदस्य सुभाष माळी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.         फोटो -१) खरसुंडी ता. आटपाडी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिवसेनेकडून श्र...

खरसुंडती भाजपाची प्रचारात जोरदार मुसंडी

आटपाडी - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीत खरसुंडी गटात खरसुंडीसह नेलकरंजी, चिचाळे, कानकात्रेवाडी आणि गोमेवाडी गावांनी आज राजकीय भूमिका स्पष्ट करत ‘कमळ’लाच मत देण्याचा अंतिम निर्णय जाहीर केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराने या गावांमध्ये अक्षरशः राजकीय वादळ निर्माण केले असून, विरोधकांच्या गोटात खळबळ उडाली आहे. खरसुंडी जिल्हा परिषद गटाचे भाजपचे अधिकृत उमेदवार चंद्रकांतभाऊ भोसले आणि खरसुंडी पंचायत समिती गणातील उमेदवार सौ. लता पुजारी व नेरकंजी गणाच्या उमेदवार पौर्णिमा महारगुडे यांच्या प्रचारासाठी चिंचाळे खरसुंडी आवटेवाडी धावडेवाडी नेलकरंजी गोमेवाडी आधी गावात उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी आणि बैठकी घेतल्या. महिला, युवक, शेतकरी व ज्येष्ठ नागरिकांचा लोंढा उसळला. विशेष म्हणजे, यावेळी प्रचाराची सूत्रे महिलांनीच हाती घेतली असून, महिलांचा अभूतपूर्व सहभाग हा या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट ठरत आहे. प्रचारादरम्यान ग्रामस्थांनी थेट शब्दांत सांगितले की, रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य, शिक्षण आणि शेतकऱ्यांचे प्रश्न या सर्व बाबींमध्ये भाजपच्या उमेदवारांनी सातत्याने प...

करगणीत राजकीय भूकंप, विरोधी तीन सदस्यानंतर आता उपसरपंचाच्या भावाचा शिवसेनेला पाठिंबा

करगणी -करगणीत भाजपाला रोज धाक्यावर धक्के बसत आहेत. अनेकांनी भाजपाची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपाच्या तब्बल तीन ग्रामपंचायत सदस्य नंतर आता विद्यमान उपसरपंच साहेबाराव खिलारी यांचे  बंधू प्रसिद्ध गलाई व्यावसायिक अंकुश खिलारी यांनी महायुतीचे उमेदवार विनायकराव मासाळ आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार दत्तात्रय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पाठिंबा जाहीर केला. यापूर्वी अभिजित जाधव,रूपाली कांबळे, उत्तम माने, या ग्रामपंचायत सदस्यांनी सेनेचा भगवा खांद्यावर घेतला होता. बड्या नेत्यांचे पक्षांतर आणि पाठिंबा: साहेबाराव खिलारी आणि  त्यांचे बंधू अंकुश खिल्लारी हे करगणी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच असून त्यांचा गावात मोठा जनसंपर्क आहे.  त्यांच्यासोबतच गलाई व्यवसायातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व अंकुश खिलारी यांनीही शिवसेनेची धुरा हाती घेण्याचा निर्णय घेतल्याने महायुतीच्या ताकदीत मोठी वाढ झाली आहे. विनायकराव मासाळ आणि दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश सोहळा संपन्न झाला.विजयाचा निर्धार: यावेळी बोलताना अंकुश खिलारी म्हणाले की, भागाच्या विकासासाठी आण...

नेलकरंजीत शिवसेनेला अभूतपूर्व प्रतिसाद

नेलकंरजी:'एकच ध्यास, खरसुंडी गटाचा विकास' हे ब्रीदवाक्य घेऊन निघालेल्या प्रचार दौऱ्याला नेलकंरजी गावात ग्रामस्थांनी उदंड आणि अभुतपुर्व प्रतिसाद दिला. आज पार पडलेल्या या दौऱ्यानिमित्त आयोजित सभेत जनसागराचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला, ज्यामुळे आगामी निवडणुकीतील विजयाचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रचार दौऱ्यादरम्यान उपस्थित प्रमुख नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी श्री. जयदीप भैय्या भोसले, डॉ. मीनाक्षी उमेश पुजारी, आणि सौ. सुनीता दत्तात्रेय सरगर यांच्यासह मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित

विद्या मोटे यांच्यासाठी लाडक्या बहिणींची वज्रमूठ; तरुणाईच्या सहभागामुळे परिवर्तनाचे वारे

आटपाडी ता. 1- संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या निंबवडे जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले असून, शिवसेनेच्या उमेदवार विद्या मोटे यांच्या पाठीशी महिला, सुशिक्षित मतदार आणि युवक मोठ्या ताकतीने उभे राहिल्याचे चित्र आहे. या गटातील प्रचाराची धुरा खुद्द महिला आणि तरुणांनीच आपल्या खांद्यावर घेतल्याने यंदा निंबवडे गटात ऐतिहासिक परिवर्तन अटळ मानले जात आहे. विद्या मोटे यांनी गेल्या चार वर्षांपासून निंबवडे गटात विविध सामाजिक उपक्रम आणि जनजागृतीच्या माध्यमातून मोठी चळवळ उभी केली आहे. त्यांच्या या कार्याचा प्रभाव तरुणांवर आणि महिलांवर मोठ्या प्रमाणावर पडला असून, त्याचाच सकारात्मक परिणाम या निवडणुकीत दिसून येत आहे. गटातील दिशा भरकटलेल्या तरुणांना प्रबोधनातून योग्य वाट दाखवण्याचे काम मोटे यांनी केले, ज्यामुळे आज सुशिक्षित युवक त्यांच्या प्रचारात अग्रभागी आहेत*लाडक्या बहिणींचा उत्स्फूर्त सहभाग* या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, सांगली जिल्ह्यात सर्वाधिक महिलांची गर्दी विद्या मोटे यांच्या प्रचारात पाहायला मिळत आहे. विशेषतः सर्वसामान्य कुटुंबातील महिला आण...

शेटफळेत आचारसंहिता संपल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवणार - विनायक मासाळ

शेटफळेत आचारसंहिता संपल्यावर वीस पंचवीस दिवसात छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वखर्चाने पुतळा बसवणार असल्याचा शब्द राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार विनायक मासाळ यांनी दिले. शेटफळे येथे प्रचार सभेत ते म्हणाले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शेटफळे सारख्या सुसंस्कृत गावात पुतळा बसविण्याची संधी मिळणार आहे. हे माझे खरोखर भाग्य समजतो."विरोधकांना माझं एवढंच सांगणं आहे, मी शब्द दिला आहे आणि तो मी पाळणारच. त्यामुळे तुम्ही उद्याच लगेच दुसरा एखादा शब्द देऊन लोकांची दिशाभूल करू नका. मला फक्त आचारसंहिता संपल्यानंतर २० ते २५ दिवसांचा अवधी द्यावा. जर या विहित काळात मी पुतळा बसवला नाही, तर तुम्ही खुशाल तो बसवावा.

जोगेश्वरी मंदिरासाठी आम्हीच निधी दिला - हर्षवर्धन देशमुख यांचा दावा

शेटफळेतील जोगेश्वरी मंदिराच्या सभागृहासाठी तात्कालिक खासदार संजयकाका पाटील यांच्या माध्यमातून आम्ही निधी दिला आहे. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी यासाठी खास प्रयत्न केला होता.  कामाचे उद्घाटन कोणीही केले असले तरी निधी हा आम्हीच दिला आहे. त्यासाठी आमचें प्रयत्न होते, असा दावा माजी सभापती हर्षवर्धन देशमुख यांनी शेटफळे येथे प्रचार सभेत केला.