शेटफळेत आचारसंहिता संपल्यावर वीस पंचवीस दिवसात छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वखर्चाने पुतळा बसवणार असल्याचा शब्द राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार विनायक मासाळ यांनी दिले. शेटफळे येथे प्रचार सभेत ते म्हणाले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शेटफळे सारख्या सुसंस्कृत गावात पुतळा बसविण्याची संधी मिळणार आहे. हे माझे खरोखर भाग्य समजतो."विरोधकांना माझं एवढंच सांगणं आहे, मी शब्द दिला आहे आणि तो मी पाळणारच. त्यामुळे तुम्ही उद्याच लगेच दुसरा एखादा शब्द देऊन लोकांची दिशाभूल करू नका. मला फक्त आचारसंहिता संपल्यानंतर २० ते २५ दिवसांचा अवधी द्यावा. जर या विहित काळात मी पुतळा बसवला नाही, तर तुम्ही खुशाल तो बसवावा.
करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा