करगणी -करगणीत भाजपाला रोज धाक्यावर धक्के बसत आहेत. अनेकांनी भाजपाची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपाच्या तब्बल तीन ग्रामपंचायत सदस्य नंतर आता विद्यमान उपसरपंच साहेबाराव खिलारी यांचे बंधू प्रसिद्ध गलाई व्यावसायिक अंकुश खिलारी यांनी महायुतीचे उमेदवार विनायकराव मासाळ आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार दत्तात्रय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पाठिंबा जाहीर केला. यापूर्वी अभिजित जाधव,रूपाली कांबळे, उत्तम माने, या ग्रामपंचायत सदस्यांनी सेनेचा भगवा खांद्यावर घेतला होता.
बड्या नेत्यांचे पक्षांतर आणि पाठिंबा:
साहेबाराव खिलारी आणि त्यांचे बंधू अंकुश खिल्लारी हे करगणी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच असून त्यांचा गावात मोठा जनसंपर्क आहे. त्यांच्यासोबतच गलाई व्यवसायातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व अंकुश खिलारी यांनीही शिवसेनेची धुरा हाती घेण्याचा निर्णय घेतल्याने महायुतीच्या ताकदीत मोठी वाढ झाली आहे. विनायकराव मासाळ आणि दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश सोहळा संपन्न झाला.विजयाचा निर्धार:
यावेळी बोलताना अंकुश खिलारी म्हणाले की, भागाच्या विकासासाठी आणि विनायकराव मासाळ यांच्या दूरदृष्टीवर विश्वास ठेवून आम्ही हा निर्णय घेतला आहे. शिवसेना आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
राजकीय वर्तुळात खळबळ:
निवडणुकीच्या तोंडावर भाजपाच्या बालेकिल्ल्यात लागलेल्या या सुरुंगामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. करगणी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात शिवसेनेची पकड आता अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसत असून, या घडामोडीमुळे संपूर्ण मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा