मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

अलनिनोचा जुलैमध्येही प्रभाव राहणार

मुंबई- यंदा दक्षिण पश्चिम मान्सूनने ट्रेंड खूपच बदलला आहे. ज्या वेगाने पाऊस पडायला हवा होता तो आत्ता पर्यंत तरी दिसलेला नाही. तज्ज्ञानी या गोंधळाला हवामान बदल किंवा चक्रीवादळ बिपरजॉयला जबाबदार धरलं आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यातही अपेक्षित पाऊस दिसत नाही, तसा अंदाज व्यक्त केला आहे ‌                         मान्सूनचा कल किती बदलत चालला आहे. रविवारी मान्सूनचे दिल्ली आणि मुंबईत एकाच वेळी आगमन झाले, असे होत नाही पण ते यंदा झाल. 21 जून 1961 नंतर यंदा रविवारीच मान्सूनने दोन्ही महानगरात आगमन केले. यंदा मान्सून दोन दिवस आधीच दिल्लीत दाखल झाला, तर मुंबईत जवळपास दोन आठवडे उशीर आला. आता प्रतीक्षा आहे ती संपूर्ण देशात मान्सूनने येण्याची.  खरी चिंता जुलैची आहे, ज्यामध्ये एल-निनो येण्याचा धोका आहे. आजपर्यंत, मान्सूनची उत्तर सीमा पोरबंदर, अहमदाबाद, उदयपूर, नारनौल, फिरोजपूरमधून जातो. IMD म्हणते की तो पंजाब, गुजरात, राजस्थानचा आणखी काही भाग, हरियाणाचा उर्वरित भाग आणि त्याच्या लगतचा भाग व्यापण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात प...

मृत्यूचा सापळा बनलेल्या समृद्धी महामार्गावरच्या अपघातात 25 जणांचा मृत्यू

बुलढाणाः समृद्धी महामार्गवर अपघातांचे सत्र अद्याप सुरूच आहे. महामार्गाचे लोकार्पण झाल्यापासून आतापर्यंतचा सर्वात भिषण अपघात सिंदखेडराजानजीक घडला आहे. ट्रॅव्हल्सपटली होऊन जागीच पेट घेतला. या अपघातात बसमध्ये झोपलेल्या 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेने अख्खा महाराष्ट्रच हळहळला.  अपघातात ट्रॅव्हल्स बस दुभाजकाला धडकली.  नंतर ती पलटी झाली. त्यानंतर ट्रॅव्हलने पेट घेतला. अपघातात बसमध्ये बसलेले प्रवाशी झोपेत होते. त्यांना काय झालं ते समजण्याआगोदर गाडी पलटी होऊन आगीने घेरली होती. आगीमध्ये होरपळून प्रवाशाचा मृत्यू झाला. तब्बल एक ते दीड तास चाललेल्या या अग्नीतांडवात 25 जणांनी जीव गमावला आहे. रात्रीची वेळ असल्याने त्यांना वाचवायला त्यांच्यापर्यंत कोणीही पोहोचू शकले नाही. ट्रॅव्हलच्या केबिनमध्ये बसलेले काही जण आणि काही प्रवासी यात बचावले आहे. गाडीच्या काचा फोडून जे बाहेर आले ते सात ते आठ जण वाचले आहेत. मध्यरात्री 2 च्या सुमारास हा अपघात घडला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्यांच्या पर्यंत मदतही वेळेत पोहोचली नाही. अपघातग्रस्त बस ही नागपूरहून पुण्याला निघा...

ज्येष्ठांना पेन्शन देताय की जाताय,,,,,,,, यांनी दिला इशारा

आटपाडी ता.१- केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना सन्माननिधी देऊन अल्प प्रमाणात सन्मान केला आहे मात्र यात साठ वर्षांवरील ज्येष्ठांचा कुठेच विचार केला नाही. देशात आणि राज्यात ज्येष्ठांची 25% वर लोकसंख्या आहे. जर का पेन्शन देणार नसाल तर सत्ताधार्‍यांना घरात बसवू असा खणखणीत इशारा देऊन राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांसह साठ वर्षांवरील ज्येष्ठांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन द्यावी, यासाठी जनता दलाने मंगळवार ता. ११ रोजी तहसील कार्यालयावर आयोजित केलेल्या मोर्चात शेतकरी आणि ज्येष्ठानी सहभागी होण्याचे आवाहन जनता दलाचे तालुका अध्यक्ष आबासो सागर यांनी केले आहे.                                                        माजी आमदार शरद पाटील, माजी आमदार रामहरी रुपनवर आणि माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाला जत, आटपाडी, खानापूर, माण, खटाव आणि सांगोला तालुक्यात गाव गावी बैठका घेऊन प्रबोधन सुरू केले आहे. या भागातून मोठ्...

राष्ट्रवादी काँग्रेसने माणगंगा साखर कारखाना विकासाचे केंद्र बनवावे

आटपाडी ता.१- येथील बंद माणगंगा साखर कारखाना सुरू करून राष्ट्रवादी काँग्रेसने आटपाडीसह सांगली, सातारा आणि सोलापूर तीन जिल्ह्याचे विकास मुख्य केंद्र बनवावे, अशी मागणी " एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी " या उपक्रमाच्या माध्यमातून घेतलेल्या बैठकीत केला.                  राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव सादिक खाटीक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीचे स्वागत असिफ खाटीक यांनी केले. यावेळी मनोज भोसले, विनोद बनसोडे, असिफ कलाल,अतुल गायकवाड, प्रकाश पाटील, आप्पासाहेब ऐवळे, अमिर तांबोळी, प्रशांत पोरे, असिफ कुरेशी, अमित खंडागळे, इम्रान शेख आदी उपस्थित होते.  बैठकीत माणगंगा साखर कारखाना बंद पडल्यामुळे झालेल्या प्रतिकूल परिणाम वर चर्चा झाली. तो कारखाना पुन्हा सुरू करावा, अशी साऱ्यांनीच अपेक्षा व्यक्त केली. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षाही व्यक्त केली. तसेच खानापूर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचाच आमदार निवडून यावा, यासाठी वाडी-वस्ती ...

श्री. संत बाळूमामा देवस्थान समितीच्या बरखास्तीची आमदार गोपीचंद पडळकराची मागणी

आटपाडी ता.३०- आदमापूर ( जि. कोल्हापूर) येथील महाराष्टाचे जागृत देवस्थान संत बाळूमामांच्या लौकीकाला व्यवस्थापन समितीच भ्रष्ट आचरणातून धक्का लावण्याचं काम करत आहे. भ्रष्टाचारात बरबटलेली ही समिती विसर्जीत करून शासनानेच धर्मादाय कायदा आणून धनगर समाजाचे प्रतिनिधित्व असलेली नविन समिती निर्माण करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे केली असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.                                                                 आदमापुर जिल्हा्ह्हा््हा्ह्हा्हा्ह्््ह्हा््हा्ह्हा््हा्ह्हा् कोल्हापूर येथील श्री संत बाळूमामा हे महाराष्ट्रात जागृत देवस्थान म्हणून श्रद्धास्थान म्हणून मानले जाते. त्याच्या दर्शनासाठी राज्य देश आणि परदेशातून कोट्यावधी भाविक दरवर्षी येतात तेथे मोठे धार्मिक सोहळे पार पडतात. तेथील व्यवस्थापन समितीच्या भ्रष्ट कारभाराची तक्रार आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा लौकिक जगात पोहोचवला- आमदार गोपीचंद पडळकर

  आटपाडी ता.३०- केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नेतृत्वाखाली भाजप सरकारने नऊ वर्षात सर्व सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून शेतकरी सन्मान या महत्वकांक्षी योजनेपासून जागतिक स्तरावर देशाची मान उंचावेल अशा अनेक योजना राबविल्या असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.                                पंतप्रधान नरेंद्र मोदी @ 9  अभियानांतर्गत येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी आमदार पडळकर यांनी नऊ वर्षात केंद्र सरकारने राबवलेल्या योजनेवर प्रकाश टाकला. तसेच विरोधकांचाही खरपूस समाचार घेतला. यावेळी भाजपच्या ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष विलास काळेबाग, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, अनिल पाटील, जयवंत सरकार, आणि भाजपचे तालुकाध्यक्ष  उमाजी सरगर प्रमुख उपस्थित होते. ते म्हणाले,"सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना सन्माननिधी देऊन खऱ्या अर्थाने देश स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदाच शेतकऱ्यांचा सन्मान करून दाखव...

'मटण खाऊन केसीआर पंढरपूरात', आ.आमोल मेटकरीची सडकून टीका

      मुंबई-तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव महाराष्ट्रात येऊन शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते त्यांच्या बीआरएस पक्षाचं महाराष्ट्रात विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत. याचअनुशंगाने त्याचा सोलापूर दौरा होत आहे. यासाठी ते हैद्राबादवरून निघाले असून त्यांच्याबरोबर 400 ते 600 वाहणांचा ताफा आहे. तर यावेळी त्यांचे अख्खे मंत्रीमंडळच सोबत आहे. ते पंढरपूर येथे जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत. यावरून सध्या चर्चा होताना दिसत आहे. तर टीका ही. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी केसीआर यांच्या मेजवाणीचा फोटो ट्विट करत टीका केली आहे. त्यांनी मटनाचा शाही बेत! पंढरी वारिवर असताना मुख्यमंत्री केसीआर हा प्रकार शोभतो का? वारकऱ्यांच्या भावनाशी खेळू नका? पंढरपूर येताना 10 हजार वेळा विचार करा असा सल्ला दिला आहे. तर पंढरीची वारी पवित्र आहे आपल्या अश्या वागण्याने अपवित्र करू नका असं म्हटलं आहे. त्याचबोरबर महाराष्ट्रात तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे आगमन होण्यापुर्वी पैशाच्या जोरावर ठिकठिकाणी मटणाचे बेत आखले जात आहेत. बॅनरवर पांडुरंगाचे फोटो तर ...