मुख्य सामग्रीवर वगळा

मृत्यूचा सापळा बनलेल्या समृद्धी महामार्गावरच्या अपघातात 25 जणांचा मृत्यू

बुलढाणाः समृद्धी महामार्गवर अपघातांचे सत्र अद्याप सुरूच आहे. महामार्गाचे लोकार्पण झाल्यापासून आतापर्यंतचा सर्वात भिषण अपघात सिंदखेडराजानजीक घडला आहे. ट्रॅव्हल्सपटली होऊन जागीच पेट घेतला. या अपघातात बसमध्ये झोपलेल्या 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेने अख्खा महाराष्ट्रच हळहळला. 
अपघातात ट्रॅव्हल्स बस दुभाजकाला धडकली.  नंतर ती पलटी झाली. त्यानंतर ट्रॅव्हलने पेट घेतला. अपघातात बसमध्ये बसलेले प्रवाशी झोपेत होते. त्यांना काय झालं ते समजण्याआगोदर गाडी पलटी होऊन आगीने घेरली होती. आगीमध्ये होरपळून प्रवाशाचा मृत्यू झाला. तब्बल एक ते दीड तास चाललेल्या या अग्नीतांडवात 25 जणांनी जीव गमावला आहे. रात्रीची वेळ असल्याने त्यांना वाचवायला त्यांच्यापर्यंत कोणीही पोहोचू शकले नाही. ट्रॅव्हलच्या केबिनमध्ये बसलेले काही जण आणि काही प्रवासी यात बचावले आहे. गाडीच्या काचा फोडून जे बाहेर आले ते सात ते आठ जण वाचले आहेत.
मध्यरात्री 2 च्या सुमारास हा अपघात घडला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्यांच्या पर्यंत मदतही वेळेत पोहोचली नाही. अपघातग्रस्त बस ही नागपूरहून पुण्याला निघाली होती. बुलढाण्यातील सिंदखेडराजानजीक पिंपळखुटा गावालगत समृद्धी महामार्गावर हा अपघात घडला. हा अपघात इतका भीषण आहे की बस संपूर्ण जळून खाक झाली आहे. 
पिंपळखुटा गावालगत समृद्धी महामार्गावर रस्ता दुभाजकाला बस धडकली आणि त्यानंतर बसने पेट घेतला. मात्र रात्रीच्या सुमारास कोणालाच ही बाब लक्षात आल्याने प्रवाशांना वाचवण्यासाठी तात्काळ मदत मिळू शकली नाहीये. प्रवासी झोपेत असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. 
अपघात झालेली बस ही विदर्भ ट्रॅव्हल्सची असून यात एकूण 33 प्रवासी होते. ट्रॅव्हलच्या केबिनमध्ये बसलेल्या काही जणांना बसमधून बाहेर पडण्यात यश आलं असून एकूण ७ जण बचावले आहे. नागपूरहून पुण्याला ही बस निघाली होती. तर बसमध्ये असलेले बहुंताश प्रवासी हे नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते