राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीमुळे राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. त्यामुळे राजकीयदृष्टया संवेदनशील असणाऱ्या खानापूर विधानसभा मतदारसंघात देखील राजकीय भूकंप घडण्याचे संकेत मिळत आहेत. माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील यांचे सुपुत्र माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांनी शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र कार्यकर्त्यांनी सतेत येण्यासाठी अजितदादा पवार यांची कास धरू, असा तगादा लावल्यामुळे भूमिका बदलण्यावरून उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील यांनी कदम गटाच्या मतदारसंघातील राजकीय हस्तक्षेपाला कंटाळून सन 2020 मध्ये काँग्रेसला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी ताकद देण्याऐवजी पाटील गटाकडे डोळेझाक केली आहे. मागच्या चार वर्षांत राष्ट्रवादीत असून देखील अजितदादा पवार यांचा अपवाद वगळता विकासकामांसाठी कोणाकडूनही अपेक्षित मदत झालेली नाही. तर दुसरीकडे माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील, माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांनी अनेकवेळा नेत्यांसमोर जाहीररीत्या परखड आणि सडेतोड भूमिका मांडत राष्ट्रवादीचा आमदार करण्यासाठी आटपाडी आणि विसापूर सर्कलमध्ये पक्ष बळकट करून समन्वय साधण्याची वारंवार मागणी केली होती. मात्र तरीही राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेतेमंडळी आणि जिल्हा नेतृत्वाकडून डोळेझाक होत असल्याने पाटील गटाची राजकीय कोंडी होत आहे.
तरीही माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील यांनी शरद पवारसाहेब यांच्यासोबत राहण्याची भूमिका जाहीर केली आहे. मात्र खानापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी पक्षाअंतर्गत गटबाजीची व्यथा मांडूनही वरिष्ठ नेतेमंडळीकडून होत असलेली डोळेझाक आणि जिल्हा नेतृत्वाकडून न मिळणारे राजकीय पाठबळ हा कळीचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. अशा राजकारणातील बिकट परिस्थितीत राजकीय स्थैर्य टिकून रहावे आणि विटा शहरातील विकासकामांसाठी भरीव निधी मिळावा, यासाठी आणि आगामी राजकीय मोर्चेबांधणीच्या दृष्टीने बदलत्या राजकीय वाऱ्याचा अंदाज घेत पाटील गटाचे कार्यकर्ते सत्तेत येण्यासाठी अजितदादा पवार यांची कास धरू, असा तगादा लावत आहेत. त्यामुळे भूमिका बदलण्यावरून
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा