बौद्ध तरुणाची गांव गुंडानी केलेल्या हत्येचा निषेध आटपाडीत नोंदवला. आटपाडीच्या तहसीलदार बी.एस. माने यांना निवेदन देऊन आरोपींना फाशी देण्याची मागणी निवेदनातून केली.
आटपाडी तालुक्यातील बौद्ध समाजाने विलास खरात यांच्या नेतृत्वाखाली निवेदन तहसीलदार बी.एस. माने यांना दिले. यात राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मौजे बोंढार हवेली या गांवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करून गावातून मिरवणूक
काढली म्हणून अक्षय भालेराव तरुणांची निघृण हत्या केली आहे. तसेच
त्यांचे आई-वडील आणि भाऊ यांना मारहाण करून बौद्ध वस्तीवर दगडफेक केली. या घटनेचे समाजात तीव्र पडसाद उमटले आहेत. सदर घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. सदरचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा. तसेच अक्षय भालेराव यांच्या कुटुंबियांना संरक्षण देउन जास्तीत जास्त आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. यावेळी विलास खरात,यशवंत मोटे, आप्पा खरात, प्रभाकर खरात,पी.एस. खरात,सुभाष झोडगे,संतोष मोटे, नंदकुमार खरात, नामदेव
वाघमारे, अशोक भांडग आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा