अकलूज ता.२५:संत तुकाराम महाराज यांची पालखी अकलूजवरून निघाल्यावर माळीनगर येथे पहिले उभे रिंगण पार पडणार आहे. उभे रिंगण संपन्न झाल्यावर पालखी बोरगावच्या दिशेने प्रस्थान ठेवणार असून बोरगाव येथे तुकोबारायांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी माळशिरसहून पहाटे प्रस्थान ठेवले आहे. त्यानंतर खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण पार पडणार आहे. रिंगण सोहळा संपन्न झाल्यावर माउलींची पालखी वेळापूरच्या दिशेने पस्थान ठेवणार असून पालखीचा वेळापूर येथे मुक्काम असणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा